शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:27 IST

राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंजय धोंडगे व अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची मागणीदिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढतेयत्या तुलनेत सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होतेतुटपुंजे पास दर्शनासाठी मिळतात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.यंदा आषाढीची वारी १२ जुलै रोजी आहे. या आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा ८ जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा, ९ जून रोजी श्रीक्षेत्र शेगावहून, संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १६ जून रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र देहूहून, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र पैठणहून, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २५ जून रोजी श्रीक्षेत्र आळंदीहून तर संत सोपानकाकांचा पालखी सोहळा ३० जून रोजी श्रीक्षेत्र सासवडहून प्रस्थान ठेवीत आहेत .संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पुणे येथे विधानभवनात होते तर राज्यातील इतर पालखी सोहळ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते. पंढरपूर येथे आषाढी वारीपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री बैठक घेतात परंतु त्यामध्ये राज्यातील पालखी सोहळ्यांच्या नियोजनापेक्षा स्थानिक प्रश्नाकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होते.संत मुक्ताबाईं व संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा जळगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याचा प्रवास सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक असतो. या सोहळ्याबरोबर सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक वारकरी असतात. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा नाशिक, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याबरोबर सुमारे एक लाख वारकरी असतात तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो. या पालखी सोहळ्या बरोबर सुमारे ५० हजार वारकरी असतात.आषाढी वारीसाठी येणाºया या पालखी सोहळ्यांसमोर वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा, गॅस, रॉकेल व पंढरपूर येथे आल्यानंतर मिळणारे तुटपुंजे दर्शन पास या सर्व अडचणी असतात. या अडचणीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सीमेवर प्रशासन सज्ज असते. सर्व सुविधा शासन पुरविते मग इतर संतांच्या बाबतीतच असा दुजाभाव का? या सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाल्या पाहिजेत.दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित समाजही सोहळ्यात येऊ लागला आहे. त्यामुळे मुक्कामाच्या जागाही कमी पडू लागल्या आहेत. संत ज्ञानदेव, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात तशा सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांना मिळावी यासाठी राज्यातील पालखी मार्गावरील जिल्हा प्रशासनाची व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व संजय महाराज धोंडगे यांनी केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर