शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:27 IST

राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंजय धोंडगे व अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची मागणीदिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढतेयत्या तुलनेत सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होतेतुटपुंजे पास दर्शनासाठी मिळतात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.यंदा आषाढीची वारी १२ जुलै रोजी आहे. या आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा ८ जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा, ९ जून रोजी श्रीक्षेत्र शेगावहून, संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १६ जून रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र देहूहून, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र पैठणहून, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २५ जून रोजी श्रीक्षेत्र आळंदीहून तर संत सोपानकाकांचा पालखी सोहळा ३० जून रोजी श्रीक्षेत्र सासवडहून प्रस्थान ठेवीत आहेत .संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पुणे येथे विधानभवनात होते तर राज्यातील इतर पालखी सोहळ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते. पंढरपूर येथे आषाढी वारीपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री बैठक घेतात परंतु त्यामध्ये राज्यातील पालखी सोहळ्यांच्या नियोजनापेक्षा स्थानिक प्रश्नाकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होते.संत मुक्ताबाईं व संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा जळगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याचा प्रवास सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक असतो. या सोहळ्याबरोबर सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक वारकरी असतात. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा नाशिक, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याबरोबर सुमारे एक लाख वारकरी असतात तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो. या पालखी सोहळ्या बरोबर सुमारे ५० हजार वारकरी असतात.आषाढी वारीसाठी येणाºया या पालखी सोहळ्यांसमोर वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा, गॅस, रॉकेल व पंढरपूर येथे आल्यानंतर मिळणारे तुटपुंजे दर्शन पास या सर्व अडचणी असतात. या अडचणीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सीमेवर प्रशासन सज्ज असते. सर्व सुविधा शासन पुरविते मग इतर संतांच्या बाबतीतच असा दुजाभाव का? या सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाल्या पाहिजेत.दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित समाजही सोहळ्यात येऊ लागला आहे. त्यामुळे मुक्कामाच्या जागाही कमी पडू लागल्या आहेत. संत ज्ञानदेव, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात तशा सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांना मिळावी यासाठी राज्यातील पालखी मार्गावरील जिल्हा प्रशासनाची व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व संजय महाराज धोंडगे यांनी केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर