शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सरकी व गाठींचे दर वाढताच कापसाच्या दरातही ३०० रुपयांची वाढ मागणी वाढली, आवक मात्र कमी

By ajay.patil | Updated: April 3, 2023 18:28 IST

कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही आपला माल विक्रीस आणताना दिसून येत नाही.

जळगाव - कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही आपला माल विक्रीस आणताना दिसून येत नाही. आता हळूहळू कापसाची मागणी वाढू लागल्याने कापसाच्या दरात गेल्या तीन ते चार दिवसात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली असून, कापसाचे भाव ७८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. आगामी काळातील दराबाबत कापूस व्यवसायातील जाणकार ठाम नसले, तरी परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यंदा जिल्ह्यात सुमारे ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी कापूस आहे. मात्र, सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस यायला लागल्यानंतर कापसाच्या दरात सारखी घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणणे कमी केले आहे. एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास कापसाचा हंगाम संपत असतो. मात्र, यंदा ५० टक्केच माल विक्री करण्यात आला आहे.

बाजारात गाठीच नाही...

खान्देशातून सध्यस्थितीत ७ लाख गाठींची खरेदी झाली आहे. अजूनही ४० ते ५० टक्के माल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यातच आता रब्बी हंगाम काढल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण देखील कमी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पुढील हंगामातच माल विक्री करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बाजारात गाठीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात गाठींचे दर वाढले आहेत. गाठींचे ५९ हजार रुपये खंडी असे दर काही दिवसांपुर्वी होते. ते दर आता ६१ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. तर सरकीच्या दरात देखील २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम कापसाच्या भावावर होत असून, कापसाचे दर देखील २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत.

गाठी व सरकीचे दर वाढल्यामुळे कापसाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यात कापसाचे दर कसे राहतील याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. मात्र, कापसाचे दर ७५०० ते ७२०० च्या खाली जाणार नाही हे मात्र निश्चित आहे.

-प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन