शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकी व गाठींचे दर वाढताच कापसाच्या दरातही ३०० रुपयांची वाढ मागणी वाढली, आवक मात्र कमी

By ajay.patil | Updated: April 3, 2023 18:28 IST

कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही आपला माल विक्रीस आणताना दिसून येत नाही.

जळगाव - कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही आपला माल विक्रीस आणताना दिसून येत नाही. आता हळूहळू कापसाची मागणी वाढू लागल्याने कापसाच्या दरात गेल्या तीन ते चार दिवसात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली असून, कापसाचे भाव ७८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. आगामी काळातील दराबाबत कापूस व्यवसायातील जाणकार ठाम नसले, तरी परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यंदा जिल्ह्यात सुमारे ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी कापूस आहे. मात्र, सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस यायला लागल्यानंतर कापसाच्या दरात सारखी घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणणे कमी केले आहे. एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास कापसाचा हंगाम संपत असतो. मात्र, यंदा ५० टक्केच माल विक्री करण्यात आला आहे.

बाजारात गाठीच नाही...

खान्देशातून सध्यस्थितीत ७ लाख गाठींची खरेदी झाली आहे. अजूनही ४० ते ५० टक्के माल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यातच आता रब्बी हंगाम काढल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण देखील कमी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पुढील हंगामातच माल विक्री करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बाजारात गाठीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात गाठींचे दर वाढले आहेत. गाठींचे ५९ हजार रुपये खंडी असे दर काही दिवसांपुर्वी होते. ते दर आता ६१ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. तर सरकीच्या दरात देखील २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम कापसाच्या भावावर होत असून, कापसाचे दर देखील २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत.

गाठी व सरकीचे दर वाढल्यामुळे कापसाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यात कापसाचे दर कसे राहतील याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. मात्र, कापसाचे दर ७५०० ते ७२०० च्या खाली जाणार नाही हे मात्र निश्चित आहे.

-प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन