शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

१७ दिवसांनंतर वरुणराजाचे शहरात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहर व जिल्हाभरात तब्बल १७ दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुणराजाने सोमवारी जळगाव शहरात रिमझिम का ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहर व जिल्हाभरात तब्बल १७ दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुणराजाने सोमवारी जळगाव शहरात रिमझिम का असेना मात्र काही वेळ हजेरी लावली. शहराव्यतिरिक्त तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, ममुराबाद, आसोदा, कानळदा, भादली परिसरात चांगली हजेरी लावली आहे. १७ दिवसांच्या मोठ्या खंडानंतर शहरात पावसाचे पुनरागमन झाले असून, आठवडाभरात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच २० पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

यंदा ३० जुलैपासून शहरात पावसाने पाठ फिरविली होती. तब्बल १७ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. शहरातील मुख्य बाजारपेठ भागात रिमझिम तर आशाबाबानगर, खोटेनगर, खंडेरावनगर भागासह केसी पार्क परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. दुपारी झालेल्या पावसानंतर वातावरणात गारवादेखील निर्माण झाला होता. दुपारी ३ वाजेनंतर आकाशात काळे ढगदेखील कायम असल्याचेच दिसून आले.

मान्सूनचे होईल जोरदार कमबॅक

गेल्या अनेक दिवसांपासून पाठ फिरवलेल्या मान्सूनचे कमबॅक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्रापासून छत्तीसगढपर्यंत व छत्तीसगडपासून ते बिहार, नेपाळपर्यंत हवेची एक ट्रॅपरेषा तयार झाली आहे. यामुळे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.