शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे क्षेत्र यंदाही ५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर) -गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५० - यावर्षी पेरणीचा अंदाज - ...

- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर)

-गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५०

- यावर्षी पेरणीचा अंदाज - ७,७७,३४७

- यंदा कापसाची पेरणीचा अंदाज - ५, लाख, ३५ हजार हेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही मान्सून सरासरी इतका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे बळीराजाने खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात ५ टक्क्यांची वाढ होण्याचा तर मक्याच्या लागवड क्षेत्रात मात्र यावर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरने घट होण्याचाही अंदाज कृषी विभागाकडून प्राथमिक स्तरावर व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी होणार आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील कृषी विभागाने बियाणे व खतांबाबत नियोजन आखले होते. मात्र ऐन वेळी साठेबाजी मुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी ताटकळत बसावे लागले होते.

३ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार

गेल्या वर्षी दोन वर्षांपासून जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळातील नियमितच्या सरासरीपेक्षा १३० ते १४५ टक्के पाऊस झाला होत आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदा स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने जिल्ह्यात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख ७५ हजार ५५० हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.

५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणी

जिल्ह्यात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ५ लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख ३५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान , आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी यावर्षी वाढणार असल्याने देखील शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार

यंदाच्या खरीप नियोजनानुसार सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले होते. मात्र यावर्षी भाव चांगले राहण्याची शक्यता असल्याने, सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये पाच ते सहा हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्यता आहे. तर मूग व उडीद चे क्षेत्र यंदाही गेल्या वर्षा इतकेच राहण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षी उडीद व मूगाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मक्याचा क्षेत्रात मात्र यावेळेस घट होण्याची शक्यता आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू वाढत असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा मक्या वर फवारणी करावी लागते. त्या बाजारात भाव देखील फारसा नसल्याने शेतकऱ्यांकडून यंदा मका लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे

पालकमंत्री घेणार ७ रोजी आढावा

जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ७ मे रोजी आढावा घेणार आहेत. गेल्यावर्षी बियाणांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली होती, त्यामुळे यावेळेस कोरोना च्या काळात शेतकऱ्यांची फिरफिर होऊ नये म्हणून बियाणांची मुबलकता करण्याबाबत पालकमंत्री सूचना देणार आहेत.