शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कापसाचे क्षेत्र यंदाही ५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर) -गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५० - यावर्षी पेरणीचा अंदाज - ...

- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर)

-गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५०

- यावर्षी पेरणीचा अंदाज - ७,७७,३४७

- यंदा कापसाची पेरणीचा अंदाज - ५, लाख, ३५ हजार हेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही मान्सून सरासरी इतका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे बळीराजाने खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात ५ टक्क्यांची वाढ होण्याचा तर मक्याच्या लागवड क्षेत्रात मात्र यावर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरने घट होण्याचाही अंदाज कृषी विभागाकडून प्राथमिक स्तरावर व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी होणार आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील कृषी विभागाने बियाणे व खतांबाबत नियोजन आखले होते. मात्र ऐन वेळी साठेबाजी मुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी ताटकळत बसावे लागले होते.

३ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार

गेल्या वर्षी दोन वर्षांपासून जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळातील नियमितच्या सरासरीपेक्षा १३० ते १४५ टक्के पाऊस झाला होत आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदा स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने जिल्ह्यात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख ७५ हजार ५५० हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.

५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणी

जिल्ह्यात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ५ लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख ३५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान , आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी यावर्षी वाढणार असल्याने देखील शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार

यंदाच्या खरीप नियोजनानुसार सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले होते. मात्र यावर्षी भाव चांगले राहण्याची शक्यता असल्याने, सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये पाच ते सहा हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्यता आहे. तर मूग व उडीद चे क्षेत्र यंदाही गेल्या वर्षा इतकेच राहण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षी उडीद व मूगाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मक्याचा क्षेत्रात मात्र यावेळेस घट होण्याची शक्यता आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू वाढत असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा मक्या वर फवारणी करावी लागते. त्या बाजारात भाव देखील फारसा नसल्याने शेतकऱ्यांकडून यंदा मका लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे

पालकमंत्री घेणार ७ रोजी आढावा

जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ७ मे रोजी आढावा घेणार आहेत. गेल्यावर्षी बियाणांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली होती, त्यामुळे यावेळेस कोरोना च्या काळात शेतकऱ्यांची फिरफिर होऊ नये म्हणून बियाणांची मुबलकता करण्याबाबत पालकमंत्री सूचना देणार आहेत.