शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांचे देव अद्याप पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:31 IST

नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. विक्रमी खासदार म्हणून नोंद असलेल्या माणिकराव गावीत यांनी वारसदारासाठी प्रयत्न चालविले आहे. पूत्र भरत यांच्यासाठी ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. आमदार के.सी.पाडवी आणि माजी आमदार पद्माकर वळवीदेखील प्रयत्नशील आहेत. रावेर मतदारसंघाची जागा राष्टÑवादीने अद्याप काँग्रेसकडे सोपवलेली नाही. त्यामुळे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.

ठळक मुद्दे ज्येष्ठत्व, निष्ठा या मुद्यावरुन माणिकरावांचे दिल्लीत वारसदारासाठी प्रयत्न फळाला जातात काय? जळगावच्या उमेदवाराचा शोध संपणार कधी? रावेरच्या जागेवरील दावा सोडण्यात राष्टÑवादीकडून विलंब कशासाठी?

मिलिंद कुलकणीलोकसभा निवडणुकीचा हा टप्पा म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याच्या काळाची आठवण करुन देतो. तीच धाकधूक, तीच उत्कंठा, तीच काळजी इच्छुक उमेदवारांना आहे. मुंबई आणि दिल्लीतील दरबारी राजकारण काही वेगळेच असते. भल्या भल्यांना तिथला अंदाज येत नाही. लॉबिंग नावाचा प्रकार ज्याला जमला तो यशस्वी ठरतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. जाहीर झालेले तिकीट अचानक कापले जाणे, खात्री असतानाही तिकीट न मिळणे, अचानक कोणता तरी मुद्दा चर्चेत येऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाणे हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. राजकीय जीवन घडणे आणि बिघडण्याच्यादृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा असतो. गॉडफादरचे महत्त्व याच टप्प्यावर कळते.निवडणुका जाहीर झाल्या. युती आणि आघाडी झाली. परंतु, जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाही. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या जागावाटपाला काही अडचण दिसत नाही. परंतु, रावेरचे त्रांगडे कायम आहे. नगर, रत्नागिरी, औरंगाबाद, यवतमाळ या जागांच्या निर्णयावर रावेरचा निर्णय अवलंबून असल्याची चर्चा रंगत होती. जळगावमध्ये राष्टÑवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीनेही चार पैकी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. ते वगळता कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाही. विद्यमान खासदारदेखील ठामपणे तिकिटाविषयी बोलताना दिसून येत नाही. प्रचार सगळे करतायत, पण डोळे आणि कान मात्र मुंबई आणि दिल्लीकडे लागलेले आहेत.जळगाव मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीचे गूढ वाढत चालले आहे. दोन टर्म खासदार असलेल्या ए.टी.पाटील यांच्याविषयी ऐन निवडणूक काळात वाद उद्भवला जातो आणि त्यांची उमेदवारी धोक्यात आणली जाते, यावरुन राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर जात आहे, हे लक्षात येते. देवकरांची उमेदवारी जाहीर करुन राष्टÑवादी काँग्रेसने ए.टी.पाटील यांची घरवापसीची शक्यता संपवून टाकली. भाजपाकडून उमेदवारीसाठी रोज नवीन नाव चर्चेत येते. परंतु, एकटे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाच खरे तर उमेदवाराचे नाव निश्चित ठावूक असेल. पण त्यांनी रहस्य कायम ठेवण्याचे ठरविलेले दिसतेय. यावरुन दोन शक्यता संभवतात. निवडणूक तंत्र पूरेपूर अवगत असलेल्या महाजन यांना जळगावच्या जागेची हमखास खात्री वाटत असावी किंवा अलिकडच्या वादाचा मतदारांवर पडलेल्या प्रभावाचा अंदाज तरी ते घेत असावे. त्यासाठी हा काळ जाऊ देणे ते आवश्यक समजत असावे. मात्र त्यामुळे डझनभर उमेदवार इच्छुकांच्या पंक्तीत येऊन बसले आहेत. ऐन दुष्काळात इच्छुकांचे ‘देव’ पाण्यात राहणार हे मात्र निश्चित.धुळे मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, दोन दिवसांपासून त्यांच्या वयाचा मुद्दा चर्चेत आला असून त्यांच्याऐवजी पूत्र आमदार कुणाल पाटील यांचे नाव अचानक पुढे आले आहे. मालेगावचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे हे देखील चर्चेत आहेत. एकीकडे माणिकरावांना वयाचा मुद्दा घेऊन तिकीट दिले जात नसेल तर पक्षश्रेष्ठी रोहिदासदाजींविषयी तो नियम लावत आहेत, असे दिसते. माणिकरावांनी पूत्र भरत बरोबरच नातीचेही नाव पुढे केल्याची चर्चा आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या कन्येसाठी हा प्रयत्न आहे.

टॅग्स :Politicsराजकारण