शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

इच्छुक उमेदवारांचे देव अद्याप पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:31 IST

नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. विक्रमी खासदार म्हणून नोंद असलेल्या माणिकराव गावीत यांनी वारसदारासाठी प्रयत्न चालविले आहे. पूत्र भरत यांच्यासाठी ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. आमदार के.सी.पाडवी आणि माजी आमदार पद्माकर वळवीदेखील प्रयत्नशील आहेत. रावेर मतदारसंघाची जागा राष्टÑवादीने अद्याप काँग्रेसकडे सोपवलेली नाही. त्यामुळे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.

ठळक मुद्दे ज्येष्ठत्व, निष्ठा या मुद्यावरुन माणिकरावांचे दिल्लीत वारसदारासाठी प्रयत्न फळाला जातात काय? जळगावच्या उमेदवाराचा शोध संपणार कधी? रावेरच्या जागेवरील दावा सोडण्यात राष्टÑवादीकडून विलंब कशासाठी?

मिलिंद कुलकणीलोकसभा निवडणुकीचा हा टप्पा म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याच्या काळाची आठवण करुन देतो. तीच धाकधूक, तीच उत्कंठा, तीच काळजी इच्छुक उमेदवारांना आहे. मुंबई आणि दिल्लीतील दरबारी राजकारण काही वेगळेच असते. भल्या भल्यांना तिथला अंदाज येत नाही. लॉबिंग नावाचा प्रकार ज्याला जमला तो यशस्वी ठरतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. जाहीर झालेले तिकीट अचानक कापले जाणे, खात्री असतानाही तिकीट न मिळणे, अचानक कोणता तरी मुद्दा चर्चेत येऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाणे हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. राजकीय जीवन घडणे आणि बिघडण्याच्यादृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा असतो. गॉडफादरचे महत्त्व याच टप्प्यावर कळते.निवडणुका जाहीर झाल्या. युती आणि आघाडी झाली. परंतु, जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाही. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या जागावाटपाला काही अडचण दिसत नाही. परंतु, रावेरचे त्रांगडे कायम आहे. नगर, रत्नागिरी, औरंगाबाद, यवतमाळ या जागांच्या निर्णयावर रावेरचा निर्णय अवलंबून असल्याची चर्चा रंगत होती. जळगावमध्ये राष्टÑवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीनेही चार पैकी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. ते वगळता कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाही. विद्यमान खासदारदेखील ठामपणे तिकिटाविषयी बोलताना दिसून येत नाही. प्रचार सगळे करतायत, पण डोळे आणि कान मात्र मुंबई आणि दिल्लीकडे लागलेले आहेत.जळगाव मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीचे गूढ वाढत चालले आहे. दोन टर्म खासदार असलेल्या ए.टी.पाटील यांच्याविषयी ऐन निवडणूक काळात वाद उद्भवला जातो आणि त्यांची उमेदवारी धोक्यात आणली जाते, यावरुन राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर जात आहे, हे लक्षात येते. देवकरांची उमेदवारी जाहीर करुन राष्टÑवादी काँग्रेसने ए.टी.पाटील यांची घरवापसीची शक्यता संपवून टाकली. भाजपाकडून उमेदवारीसाठी रोज नवीन नाव चर्चेत येते. परंतु, एकटे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाच खरे तर उमेदवाराचे नाव निश्चित ठावूक असेल. पण त्यांनी रहस्य कायम ठेवण्याचे ठरविलेले दिसतेय. यावरुन दोन शक्यता संभवतात. निवडणूक तंत्र पूरेपूर अवगत असलेल्या महाजन यांना जळगावच्या जागेची हमखास खात्री वाटत असावी किंवा अलिकडच्या वादाचा मतदारांवर पडलेल्या प्रभावाचा अंदाज तरी ते घेत असावे. त्यासाठी हा काळ जाऊ देणे ते आवश्यक समजत असावे. मात्र त्यामुळे डझनभर उमेदवार इच्छुकांच्या पंक्तीत येऊन बसले आहेत. ऐन दुष्काळात इच्छुकांचे ‘देव’ पाण्यात राहणार हे मात्र निश्चित.धुळे मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, दोन दिवसांपासून त्यांच्या वयाचा मुद्दा चर्चेत आला असून त्यांच्याऐवजी पूत्र आमदार कुणाल पाटील यांचे नाव अचानक पुढे आले आहे. मालेगावचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे हे देखील चर्चेत आहेत. एकीकडे माणिकरावांना वयाचा मुद्दा घेऊन तिकीट दिले जात नसेल तर पक्षश्रेष्ठी रोहिदासदाजींविषयी तो नियम लावत आहेत, असे दिसते. माणिकरावांनी पूत्र भरत बरोबरच नातीचेही नाव पुढे केल्याची चर्चा आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या कन्येसाठी हा प्रयत्न आहे.

टॅग्स :Politicsराजकारण