शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जळगावातील समांतर रस्त्याच्या कामाला एप्रिलचा मुहूर्त, जिल्हाधिका-यांनी दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:29 IST

समांतर रस्ते कृती समितीच्या आंदोलनाला यश

ठळक मुद्दे50 मिनिटे रस्तारोकोशालेय विद्याथ्र्यासह हजारो शहरवासीयांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10- जळगाव शहरातून जाणा:या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या समांतर रस्त्याचे काम एप्रिल अखेर करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी समांतर रस्ते कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांना दिले. यामुळे शहरातील हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, या समांतर रस्त्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर तब्बल 50 मिनिटे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाना जिल्हा प्रशासनाच्या पत्राने यश आल्याचे मानले जात आहे. जळगाव शहरातील 5 लाख नागरिकांच्या जीवन मरणाचा ज्वलंत विषय बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा विस्तार व समांतर रस्ते विकास यासाठी बुधवार, दि. 10 जानेवारीस समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 10.45 वाजता रस्तारोकोस सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांना समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जोर्पयत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तो र्पयत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम होते. त्यावेळी जिल्हाधिका:यांनी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या कामातून कोणकोणती कामे करण्यात येणार आहे, याची माहिती दिली व तसे लेखी पत्र कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांकडे दिले. त्यानंतर 50 मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.  आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. महामार्गावर कोणताही गोंधळ व अनुचित प्रकार न होता आंदोलन शिस्तबद्धतेत व शांततेत पार पडले. 

समांतर रस्त्यांचा मागणीसाठी जळगावकरांची ‘वज्रमुठ’शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात यावे या मागणीसाठी समांतर रस्ता कृतीसमितीच्या वतीने बुधवारी शहरातील अजिंठा चौकात ‘महामार्ग रोको’ आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात 2 हजारहून अधिक शालेय विद्यार्थी व हजारो जळगावकरांनी सहभागी घेवून, ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’ असा हुंकार भरत, प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हाधिका:यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलकांना लेखी हमी दिल्यानंतर या आंदोलनाचा समारोप झाला.  या आंदोलनासाठी जळगावकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी 9.30 वाजेपासून शालेय विद्याथ्र्यानी हातात विविध घोषणांचे फलक घेवून, आपल्या शिक्षकांसह अजिंठा चौकात जमायला सुरवात केली होती. तर सर्वसामान्य नागरिक देखील सकाळी 10 वाजेर्पयत या ठिकाणी जमले होते. 10.45 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’, ‘अभी तो ली अंगडाई है, असली लडाई बाकी है’,  अशा घोषणांनी संपूर्ण अजिंठा चौक आंदोलकांनी दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान जाणा:या रुग्णवाहिका व अंत्ययात्रेला आंदोलकांनी मार्ग करुन दिला. तसेच आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही अनुचित कार्य आंदोलकांनी केले नाही.