शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जळगावातील समांतर रस्त्याच्या कामाला एप्रिलचा मुहूर्त, जिल्हाधिका-यांनी दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:29 IST

समांतर रस्ते कृती समितीच्या आंदोलनाला यश

ठळक मुद्दे50 मिनिटे रस्तारोकोशालेय विद्याथ्र्यासह हजारो शहरवासीयांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10- जळगाव शहरातून जाणा:या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या समांतर रस्त्याचे काम एप्रिल अखेर करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी समांतर रस्ते कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांना दिले. यामुळे शहरातील हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, या समांतर रस्त्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर तब्बल 50 मिनिटे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाना जिल्हा प्रशासनाच्या पत्राने यश आल्याचे मानले जात आहे. जळगाव शहरातील 5 लाख नागरिकांच्या जीवन मरणाचा ज्वलंत विषय बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा विस्तार व समांतर रस्ते विकास यासाठी बुधवार, दि. 10 जानेवारीस समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 10.45 वाजता रस्तारोकोस सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांना समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जोर्पयत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तो र्पयत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम होते. त्यावेळी जिल्हाधिका:यांनी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या कामातून कोणकोणती कामे करण्यात येणार आहे, याची माहिती दिली व तसे लेखी पत्र कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांकडे दिले. त्यानंतर 50 मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.  आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. महामार्गावर कोणताही गोंधळ व अनुचित प्रकार न होता आंदोलन शिस्तबद्धतेत व शांततेत पार पडले. 

समांतर रस्त्यांचा मागणीसाठी जळगावकरांची ‘वज्रमुठ’शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात यावे या मागणीसाठी समांतर रस्ता कृतीसमितीच्या वतीने बुधवारी शहरातील अजिंठा चौकात ‘महामार्ग रोको’ आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात 2 हजारहून अधिक शालेय विद्यार्थी व हजारो जळगावकरांनी सहभागी घेवून, ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’ असा हुंकार भरत, प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हाधिका:यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलकांना लेखी हमी दिल्यानंतर या आंदोलनाचा समारोप झाला.  या आंदोलनासाठी जळगावकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी 9.30 वाजेपासून शालेय विद्याथ्र्यानी हातात विविध घोषणांचे फलक घेवून, आपल्या शिक्षकांसह अजिंठा चौकात जमायला सुरवात केली होती. तर सर्वसामान्य नागरिक देखील सकाळी 10 वाजेर्पयत या ठिकाणी जमले होते. 10.45 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’, ‘अभी तो ली अंगडाई है, असली लडाई बाकी है’,  अशा घोषणांनी संपूर्ण अजिंठा चौक आंदोलकांनी दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान जाणा:या रुग्णवाहिका व अंत्ययात्रेला आंदोलकांनी मार्ग करुन दिला. तसेच आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही अनुचित कार्य आंदोलकांनी केले नाही.