शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

एप्रिलपासून ३९४ गावांना जाणवू शकते पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST

पाणीटंचाई आराखडा तयार, फक्त ९ गावांना लागेल टँकर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एप्रिल ते जून या ...

पाणीटंचाई आराखडा तयार, फक्त ९ गावांना लागेल टँकर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एप्रिल ते जून या तिमाहीत १५०७ महसुली गावांपैकी ३९४ गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते तर ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. यात अमळनेर तालुक्यात सात, बोदवड आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये झालेला समाधानकारक पाऊस, जीवनदायिनी गिरणा नदीवरील बंधारे, वाघूर, गिरणा, हतनूर यासारखी धरणे पूर्ण भरल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागलेला नाही. जिल्ह्यात एकूण १५०७ महसुली गावे आहेत. त्यापैकी ३९४ गावांना यंदा पाणी टंचाईच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जिल्ह्यात ९७ विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण केले जाणार आहे. तर २६६ विंंधन विहिरीचे अधिग्रहण केले जाऊ शकते.

पाणी टंचाईचा आराखडा तयार

पाणी टंचाई अहवाल ऑक्टोबर ते जून या कालावधीत तीन तिमाहीसाठी तयार केला जातो. त्यापैकी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या काळा जिल्ह्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाईची समस्या नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडे त्याची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. पाणी टंचाईचा कृती आराखडा जळगाव जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

कुठेही टँकर नाही.

मार्च सुरू झालेला आहे. राज्यातील बहुतेक गावांमध्ये पाणी टंचाईचे स्वरुप बिकट झाले आहे. मात्र सुदैवाने जळगाव जिल्ह्यातील एकाही गावाला पाणी टंचाईचा सामना अजून पुढचा महिनाभर तरी करावा लागणार नाही. जिल्ह्यातील एकाही गावातून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आलेली नाही.

९७ विहिरींच्या अधिग्रहणाचा आराखड्यात समावेश

जिल्ह्यातील ९७ विहिरी आणि कूपनलिका यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये गरज भासेल त्या गावांमध्ये या विहिरीचे अधिग्रहण केले जाऊ शकते.

जिल्ह्यातील एकूण गावे १५०७

बोअरवेलची होणार दुरुस्ती २६६

विहिरीतील काढला जाणार गाळ १७

पाणी टंचाईची शक्यता असलेली गावे ३९४

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती - २०