शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला अखेर विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. हे काम लवकर मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून या निधीला मंजुरी मिळवून घेतली आहे. विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच या पुलाचे कामदेखील सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात मुख्य अडथळा हा महावितरणचे विद्युत खांब हटविण्याचे काम ठरत आहे. हे खांब हटवले गेले नसल्याने, पुलाचे कामदेखील रखडत आहे. जोपर्यंत विद्युत खांब हटविले जाणार नाही तोपर्यंत पुलाचे कामदेखील होणार नाही. या रखडत जाणाऱ्या कामामुळे शिवाजीनगरातील नागरिक व जळगाव तालुक्यातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. या कामाला मंजुरी लवकर मिळाली तर पुढील कामाचा मार्ग सुकर होणार असल्याने, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व विभागीय आयुक्तांची व्हीसी झाली. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत कामांबाबत संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांना दिली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनीदेखील या कामाचा निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र शनिवारी महापालिका प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सोमवारीच महापालिकेला मिळालेला निधी महावितरणकडे वर्ग करून विद्युत काम हटविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडल्यामुळेच प्रशासकीय कामाला आली गती

शिवाजीनगरवासीयांसाठी जळगाव तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने या विषयावर पाठपुरावा केला. यामुळेच प्रशासकीय यंत्रणेला जाग येऊन या कामासाठी गती आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. पाच लाख नागरिकांच्या प्रश्न असल्याने या पुलाचे काम आता कोणत्याही प्रश्नासाठी प्रलंबित राहणार नाही अशीही ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.