शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला अखेर विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. हे काम लवकर मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून या निधीला मंजुरी मिळवून घेतली आहे. विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच या पुलाचे कामदेखील सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात मुख्य अडथळा हा महावितरणचे विद्युत खांब हटविण्याचे काम ठरत आहे. हे खांब हटवले गेले नसल्याने, पुलाचे कामदेखील रखडत आहे. जोपर्यंत विद्युत खांब हटविले जाणार नाही तोपर्यंत पुलाचे कामदेखील होणार नाही. या रखडत जाणाऱ्या कामामुळे शिवाजीनगरातील नागरिक व जळगाव तालुक्यातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. या कामाला मंजुरी लवकर मिळाली तर पुढील कामाचा मार्ग सुकर होणार असल्याने, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व विभागीय आयुक्तांची व्हीसी झाली. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत कामांबाबत संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांना दिली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनीदेखील या कामाचा निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र शनिवारी महापालिका प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सोमवारीच महापालिकेला मिळालेला निधी महावितरणकडे वर्ग करून विद्युत काम हटविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडल्यामुळेच प्रशासकीय कामाला आली गती

शिवाजीनगरवासीयांसाठी जळगाव तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने या विषयावर पाठपुरावा केला. यामुळेच प्रशासकीय यंत्रणेला जाग येऊन या कामासाठी गती आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. पाच लाख नागरिकांच्या प्रश्न असल्याने या पुलाचे काम आता कोणत्याही प्रश्नासाठी प्रलंबित राहणार नाही अशीही ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.