शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

उन्हाळी परीक्षांचा अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, जुलै २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, परिसंस्थांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावले जाऊ नये, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे अर्ज सादर करते वेळी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण उद्भवू नये तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षा समन्वयकाची नियुक्ती करावी. परीक्षा समन्वयकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरिता महाविद्यालयाची, बँकेची माहिती, अकाऊंट नंबर, आयएफएससी कोड इत्यादी बाबी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द कराव्यात. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण ज्या त्या महाविद्यालयाने त्यांचे स्तरावर करावे. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच विद्यापीठाचे मार्गदर्शन घ्यावे,अशा सूचना विद्यापीठाने केल्या आहेत.

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठी सुविधा

कोविड-१९ च्या अनुषंगाने महाविद्यालयांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज व ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी डिजिटल युनिर्व्हसिटी पोर्टल वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म सबमिशन या सुविधेव्दारे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याबाबत कळवावे. परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवू नये व विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षा अर्ज भरण्याकरिता महाविद्यालयात जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.

यू.पी.आय.व्दारे भरणा शक्यतो टाळावा

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरताना शक्यतो डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करावा. यू.पी.आय.व्दारे भरणा शक्यतो टाळावा. विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमधून फी डेबिट झाली तथापि फॉर्म भरला गेला नसेल तर पुन्हा पेमेंट करू नये. अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म तीन ते चार दिवसांमध्ये बँक रिकन्सिलेशन झाल्यानंतर ऑटो सबमिट होईल त्यासाठी पुन्हा फी भरण्याची विद्यार्थ्यांनी घाई करू नये. अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी.पाटील यांनी दिली आहे.