शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वृक्षकराची रक्कम इतर कामावर केली खर्च

By admin | Updated: October 23, 2014 14:08 IST

गेल्या दहा वर्षात सुमारे ३ कोटींच्या आसपास वृक्षकराची वसुली झालेली असताना त्या तुलनेत वृक्ष लागवड व संवर्धनावर मनपाकडून खर्च झालेला दिसत नाही.

 

 
जळगाव : मनपाकडून मालमत्ता करात एकूण करयोग्य मूल्यावर 0.५ टक्के वृक्षकरही आकारला जातो. गेल्या दहा वर्षात सुमारे ३ कोटींच्या आसपास वृक्षकराची वसुली झालेली असताना त्या तुलनेत वृक्ष लागवड व संवर्धनावर मनपाकडून खर्च झालेला दिसत नाही. लावलेली झाडेही जगविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. 
मनपा व त्यापूर्वी न.पा.कडून मालमत्ताकरात करयोग्य मूल्याच्या 0.५ टक्के रक्कम वृक्षकर म्हणून वसूल केली जाते. वर्षभरात सुमारे ३0 लाखांच्या आसपास ही रक्कम वसूल होते. गेल्या १0 वर्षात सुमारे ३ कोटींच्या आसपास रक्कम वृक्षकरापोटी वसूल करण्यात आली आहे. ज्या कारणासाठी ही रक्कम वसूल केली, त्याच कामावर ती खर्च होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही. 
मनपाकडून वृक्ष लागवडीवर व वृक्षसंवर्धनावर अपेक्षित खर्च व परिश्रम घेतले जात नसल्याचे चित्र आहे. इतकेच काय, मनपाची उद्यानेदेखील उघडी, बोडकी दिसू लागली आहेत. 
जळगाव शहराचे तापमान उष्ण असल्याने वातावरण थंड राहण्यासाठी शहर व परिसरात अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. मात्र नेमके याच विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कागदोपत्री १0 वर्षात ८५ हजार वृक्षलागवड
तत्कालीन न.पा.च्या काळात दरवर्षी सुमारे हजार रोपांची लागवड मनपातर्फे केली जात असे. मनपा निर्मितीनंतर दरवर्षी सुमारे २५ हजार रोपांची लागवड केली जात असे. तर मागील वर्षी केवळ सामाजिक वनीकरणकडून फुकट मिळालेली ५ हजार रोपे लावण्यात आली. गेल्या १0 वर्षात या हिशेबाने कागदोपत्री सुमारे ८५ हजार वृक्षलागवड मनपाने केली आहे. मात्र शहरातील चित्र पाहता, ही आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास येते. कारण रोपांची लागवड न करता अनेक संस्थाना रोपांचे वाटप करून टाकले जात असे. त्याची लागवड केली की नाही? ती रोपे जगविली का? याची माहिती मनपाकडे नाही. तसेच मनपा प्रभाग कार्यालयांतर्फे लागवड केलेल्या रोपांबाबतही किती जगली? याची आकडेवारी मनपा दप्तरी नाही.