शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

टंचाई उपाययोजनांमध्ये ४० टक्के गावे अमळनेर, पारोळा तालुक्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपा केली असली तरी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अमळनेर तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपा केली असली तरी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अमळनेर तालुक्यातील ८० गावे तर पारोळा तालुक्यातील ७७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण आराखडा पाहता ४० टक्के गावे या दोन्ही तालुक्यातीलच आहे. त्यामुळे दमदार पाऊस होऊनही या तालुक्यांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात की काय असे चित्र सध्या आहे. जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी ३८ टक्के उपाययोजना या दोनच तालुक्यांमध्ये आहे.

जिल्ह्यावर सलग दुसऱ्या वर्षी वरूणराजाची कृपा राहिल्याने संभाव्य पाणीटंचाई आराखड्यातील उपाययोजनांवरील खर्चात कपात होऊ शकली. त्यामुळे यंदाचा टंचाई आराखडा दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपयांवर आला आहे. असे असले तरी अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावांवर टंचाईचे सावट आहे. उपाययोजनांवरील एकूण खर्चापैकी ७० लाख ९० हजार रुपयांची तरतूद या दोन्ही तालुक्यांसाठी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस होऊन पावसाने सरासरी ओलांडली. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली होती. त्यामुळे नद्या, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. नद्या, तलावांना पाणी असल्याने टंचाई आराखड्यातील तरतूद घटू शकली. मात्र तरीदेखील वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता जिल्ह्यात टंचाई उद्भवण्याची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये विहीर, कूपनलिका, प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोलीकरण, अशा १५ तालुक्यांमध्ये एकूण ४१७ योजनांद्वारे दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपये खर्च करून टंचाई निवारण केले जाणार आहे.

अमळनेर, पारोळा तालुक्यात ३८ टक्के योजना

टंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये प्रत्येक तालुक्याची आकडेवारी पाहिली असता अमळनेर व पारोळा तालुक्यात एकूण योजनांपैकी ३७.६४ टक्के योजना राबविल्या जाणार आहे यावरूनच या दोन्ही तालुक्यांच्या टंचाईचा अंदाज येऊ शकतो. सर्वाधिक योजना अमळनेर तालुक्यात राबविल्या जाणार आहे. येथे ४० लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पारोळा तालुक्यात ७८ योजनांद्वारे ३० लाख ७० हजार, तर धरणगाव तालुक्यात ६८ योजनांद्वारे ३१ लाख २० हजार रुपये खर्च करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या जाणार आहे.

तालुकानिहाय गावे, योजनांची संख्या व खर्च

तालुका--- गावांची संख्या ---- योजना संख्या--- खर्च

अमळनेर---८०--- ८०---४०.२०

भडगाव---८---८---१.९२

भुसावळ---४---४---११.०८

बोदवड---१४---१५---७.७६

चाळीसगाव ---४५---४५--- १९.८०

चोपडा ---२४---२४---१३.१२

धरणगाव---४८---६८--- ३१.२०

एरंडोल---७---७--- २.५२

जळगाव---७---१७--- ९.२८

जामनेर---१६---१६--- ५.७६

मुक्ताईनगर ---१७---१७---९.२०

पाचोरा ---२५---२५---११.४०

पारोळा ---७७---७८--- ३०.७०

रावेर ---५--- ५---२.९२

यावल---८---८--- ६.३२