शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

अमळनेरची सहा जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:53 IST

कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.

जळगाव : उद्योग व भिशीतून कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दिवसात या टोळीचा पर्दाफाश केला असून अमळनेर शहरात रात्रभर धाडसत्र राबवून सहा जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यापैकी एकाला बडोदा (गुजरात) येथून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारावर मोबाइल सीम कार्ड मिळविल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पत्रपरिषदेत दिली.गेल्या आठवडय़ात 3 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अमळनेर शहरातील ग्लोबल स्कूलजवळून डॉ.निखिल बहुगुणे यांच्या पार्थ या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. अपहरणकत्र्यानी पार्थला कारमध्ये कोंबून डॉ.बहुगुणे यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. महेश विनायक खांजोडकर (बारी) वय 33, त्याचा भाऊ सुनील विनायक बारी (वय 36 दोन्ही रा.बालाजीपुरा,अमळनेर), भरत दशरथ महाजन (वय 24 रा.शिवम नगर, अमळनेर), भटू हिरामण बारी (मूळ रा.अमळनेर ह.मु.बडोदा, गुजरात) व अनिल नाना भिल (वय 20, रा.बहादरपूर रोड, अमळनेर) या सहा जणांनी पार्थचे अपहरण केले होते.पोलीस ठार मारतील या चर्चेनेच सोडले पार्थलाघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांच्यासह पथकाला अमळनेरात रवाना केले होते. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. अपहरणकर्ते सापडले तर सोडायचे नाही, थेट गोळ्याच झाडायच्या अशी चर्चा काही पोलिसांमध्ये सुरू असताना ते शब्द  शहरात पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवणा:या मुख्य सूत्रधार महेश याने ऐकले अन् त्याचा थरकाप उडाला. त्याने तातडीने सहका:यांशी संपर्क साधून पार्थला आहे त्या ठिकाणी सोडून देण्याचे सांगितले. त्यामुळे या पाच जणांनी अमळगाव येथे रात्री दीड वाजता सोडून पळ काढला होता.पथकाला दहा हजारांचे बक्षीसपार्थची सुखरूप सुटका व आरोपींच्या अटकेत यश आल्याने सुपेकर यांनी तपास पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यात पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल,सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, विजय पाटील, दिलीप येवले, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, अशोक चौधरी, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, दिनेश बडगुजर, प्रकाश महाजन, जयंत चौधरी, विनोद पाटील, विलास पाटील, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे.