शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अमळनेरकरांची पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:23 IST

अमळनेर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शहरातील शेकडो दात्यांनी वस्तूरुपी मदतीचा हात हिला आहे. अवघ्या दोन दिवसात मोठ्या ...

अमळनेर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शहरातील शेकडो दात्यांनी वस्तूरुपी मदतीचा हात हिला आहे. अवघ्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक सामग्री जमा झाली आहे. हे साहित्य प्रत्यक्ष पूरग्रस्तांना देण्यासाठी स्वयंसेवक ट्रक घेऊन सांगलीकडे रवाना झाले.अमळनेर तालुका गिरिभ्रमण ग्रुप, अमळनेर सायकलिस्ट ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, फोटोग्राफर असोसिएशन एन.यू.जे.एमतर्फे सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याची मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला. रविवारी मोठ्या प्रमाणात मदत गोळा झाली. कार्यकर्त्यांनी शहरात फिरून हे साहित्य जमा केले. यात जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, चादरी व शालींचा समावेश आहे. ही वस्तूरूपी मदत ११ रोजी रात्री ट्रकद्वारे पूरग्रस्त भागात रवाना झाली आहे.सांगली जिल्ह्यातील एकी पूरग्रस्त गावात अजून कोणतीही मदत पोहोचलेली नाही. तेथील नागरिकांना या जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. सोबत गेलेले स्वयंसेवक इतर मदतकार्यदेखील करणार आहेत. जमा झालेल्या वस्तूंमध्ये धान्य (तांदूळ, डाळ, साखर), कोरडी चटणी, ग्लुकोज बिस्किटे, एनर्जी चॉकलेट, लवकर वाळणारे आंघोळीचे रुमाल आदींचा समावेश आहे. त्यात तांदूळ १ टन, डाळ दोन क्विंटल, अंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, खोबरेल तेल, बिस्किट, मॅगी, कपडे, औषधी, चादर, बेडशीट, ज्वारी, बाजरी, गहू पीठ, कंगवे, चटणी, मीठ, कांदे यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून शेकडो हात पुढे आल्याने मोठी मदत जमा झाली आहे. या वस्तू गोळा करणे, पॅकिंग करणे, गाडी भरणे, आदी कार्य स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनी केले आहे.यामध्ये डॉ.चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, महेंद्र पाटील, सागर अहिरे, जितेंद्र शिरसाळे, राजेंद्र पाटील, हरीश देशमुख, उमेश धनराळे, जयवंत ढवळे, विकासराव जोशी, प्रकाश ताडे, संकल्प वैद्य, पंडित नाईक, हितेश शहा, ओम पाटील, प्रदीप कंखरे, समाधान पाटील, तन्मय कुलकर्णी, प्रसाद मांडे, राकेश पवार, ईश्वर देशमुख, बंटी पाटील, गणेश भावसार आदींचा समावेश आहे.