शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत ठेवली झाकली मूठ सव्वा लाखाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:32 IST

चौधरी व वाघ यांना आशीर्वाद आहेत का ? जनतेला विचारला सवाल

अमळनेर : निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगत तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेत केला. जनतेनेही मोठ्या आवाजात प्रतिसाद दिलादुपारी दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अमळनेरात पोहचली. येथील फरशी पुलावर रमाबाई आंबेडकर चौकात सभेला सुरुवात झाली. वाहनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी होते. रस्ते, जलयुक्त शिवार आदी कामांचा उल्लेख त्यांनी केला.झाकली मूठ सव्वा लाखाची...जनतेला आवाहन करताना आमदार शिरीष चौधरी व स्मिता वाघ यांना तुमचा आशीर्वाद आहे का, असा सवाल करीत विधानसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली. मुख्यमंत्री शिरीष चौधरींना जवळ करतात की स्मिता वाघ यांना, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले होते.मुख्यमंत्र्यांचे पैलाड भागात आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात तसेच कळमसरे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम मंडळाने स्वागत केले. यावेळी पूरग्रस्तांसाठी अमळनेर टॅक्सी युनियन पदाधिकारी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजपच्या कविता जाधव यांनी मुख्यमंत्री निधीला मदत केली.यावेळी व्यसपीठावर उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पंचायत समिती सभापती वजाताई भिल, बाजार समिती सभापती प्रफुल पवार, जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील, संगीता भिल, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील, माधुरी पाटील, शहराध्यक्ष शीतल देशमुख, भिकेश पाटील, महेश पाटील, महेंद्र बोरसे, रामभाऊ संदनशिव उपस्थित होते.आणि साहेबरावांना विचारला सवाल...तुमचा जनादेश आहे का, असे आवाहन जनतेला करत असताना गिरीश महाजनांनी फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यावर लागलीच त्यांनी स्मित हास्य करीत तुमचा जनादेश आहे का, असे साहेबरावांना जाहीरपणे विचारले. त्यावर त्यांनीही हसत होकार दिला.पक्षातील गटबाजीचे दर्शनयावेळी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे स्पष्टपणे उघड झाले. उदय वाघ, पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांचे वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचा स्वतंत्र गट पैलाड भागात स्वागताला उभा होता. त्यावेळी ठाकूर समाजाने त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, पाडळसरे जनआंदोलन समितीने १५०० कोटी दिल्याबद्दल आभार मानले.