शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

वारस नोंदीतील आरोप तथ्यहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पिंप्राळा आणि निमखेडी शिवारातील मिळकतींवर वारस दाखल करण्याच्या कामात रीतसर अर्ज प्रकरण तलाठी कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पिंप्राळा आणि निमखेडी शिवारातील मिळकतींवर वारस दाखल करण्याच्या कामात रीतसर अर्ज प्रकरण तलाठी कार्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानुसार फेरफार दाखल करून पत्नी, मुलगा व आई यांना वारस दाखल झाले होते. तरी कुटुंबातील आपापसातील वादात तलाठी यांच्यावर झालेले आरोप हे तथ्यहीन आहे, असे निवेदन जळगाव तालुका तलाठी संघाने प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले आहे.

पिंप्राळा येथे काही दिवस आधी दिराने भावजयीची हत्या केली होती. मयत महिलेचे नाव योगिता मुकेश सोनार असे आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाली होती. त्यात मयत महिलेच्या नातेवाइकांनी सत्यता न पडताळता प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तलाठी यांची प्रतिमा मलीन झाली असून त्यातील सत्यता निर्दशनास आणून देण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे. तसेच जळगाव तालुका तलाठी संघाने या तथ्यहीन आरोपांचा जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणात सदर वारस हे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ नुसार लावण्यात आले आहे. त्यातील कलम ८ नुसार मयत व्यक्तीची पत्नी, मुलगा व आई असे वारस दाखल झाले आहेत.