शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

धुळीने माखले सारे शेतशिवार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:48 IST

जळगाव-औरंगाबाद महामार्ग । शेतकरी वर्ग हैराण, उत्पादनावरही परिणाम

पाळधी, ता. जामनेर : परिसरातून जात असलेल्या जळगाव औरंगाबाद महामार्गाचे गेल्या दोन वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. पाळधी ते पहुर रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले असुन महामार्गावरून येणाऱ्या - जाणाºया लहान , मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्यावरील मातीतून वाहन गेले की लगेच धुळीचे लोट उठून नजीकच्या शेतातील पिकांवर बसून पिकांना याचा फटका बसत आहे.तसेच ये - जा करणाºया वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांची कपाशी, तुरी, मिरची, हरभरा, दुबारे मका पिके धुळीने माखल्याचे दृश्य दिसत असते.यामुळे धुळीने वाहनधारक तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या एक ते दोन वर्षभरापासून नेरी, पाळधी, पहुर व वाकोदपर्यत महामार्गाचे काम हे संथ गतीने चालू आहे. पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होऊन रस्त्यावर बर्याच लांबपर्यत धुळ पसरली जाते.यावेळी आसपासच्या शेतकºयांच्या शेतमालावर धुळ साचली जाते यामुळे येथील रस्त्यालगतच्या शेतातील कपाशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान होत असून वाहनधारकही धुळीने त्रस्त झाले आहेत.कपाशीवर साचलेल्या काळपट धुळीने कापूस वेचणीसाठी तयार होत नाहीत. यामुळे कापुस वेचणी करणेही अवघड झाले आहे.पिकांची वाढ खुंटलीतसेच रब्बी पेरणीनंतर उगवलेला मका, हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत असुन धुळीच्या परिणामाने हीे पीके धोक्यात आली आहेत.