शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी होत नाही तोपर्यत संघर्ष सुरुच राहणार : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 14:22 IST

जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी केले

 अमळनेर,दि.16- शेतक:यांना ताठ मानेने उभे राहता यावे व त्यांचा 7/12 कोरा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी अमळनेर येथील सभेतदरम्यान केले .

शेतकरी संघर्ष यात्रेनिमित्त अमळनेर येथे झालेल्या सभेस व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, आमदार डॉ.सतीश पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.
या निगरगठ्ठ शासनाला काही घेणं-देणं नाही
आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शासनाने सडकून टीका केली.ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे.मात्र कुठलीही कामे झाली नाहीत.जळगाव जिल्ह्याला महत्वाची खाती मिळालेली असतांना पाडळसे धरणाचे काम संथगतीने सुरू आहे, उपसा सिंचन योजना बंद आहेत.काही मागणी केली की थातुरमातुर उत्तरे दिली जातात. या निगरगठ्ठ शासनाला शेतक:यांशी काही घेणे-देणे नाही. उत्तर प्रदेश सरकार शेतक:यांना कर्जमाफी देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का देत नाही असाही सवाल त्यांनी केला.
शेतकरी राजा पेटून उठ
शेतकरी राजा जीवन एकदाच मिळते. आपण गप्प बसलो तर शासन आपल्या डोक्यावर मिरे वाटेल. आपल्या हक्कासाठी शेतकरी राजा पेटून उठ असे भावनिक आवाहन त्यांनी केले.कांद्याला 1 रुपयांचे अनुदान जाहीर करुन शेतक:यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या शासनाने केले आहे. 1 रुपयात चहा तरी मिळतो का? असे ते म्हणाले.
प्रास्तविक अॅड.ललिता पाटील यांनी तर सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले.