शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अहिरवाडी फिडरला वारा व पावसाची झाली आहे अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:02 IST

संताप : वाघोड, कर्जोद व आहिरवाडीत अनेकदा होतो अंधार

रावेर : शहरातील १३२ केव्ही विद्युत केंद्रातून अहिरवाडी, कर्जोद व वाघोड गावांसाठी निघालेल्या स्वतंत्र फिडरवर वादळचं नव्हे तर हलका वारा वा पाऊस असला तरी रात्र रात्रभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने, सदर फिडरला वारा व पावसाची अ‍ॅलर्जी झाली आहे का? अशी तीव्र नापसंती उभय ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.एखाद्या वादळात वा विजांच्या कडकडाटात वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज ग्राहकही परिस्थितीनुरूप तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन संयमाने ते सहन करीत असतात. मात्र, हलक्या वाऱ्याची झुळूक वा पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी अहिरवाडी फिडरवरील वीजपुरवठा खंडित झाला तर तो रात्र रात्रभर खंडीतचं असतो. यामुळे वाघोड, कर्जोद व अहिरवाडी ही तिन्ही गावे अंधारात बुडत असल्याची शोकांतिका आहे. रावेर ते अहिरवाडी हे फिडर अंकलेश्वर - बºहाणपूर रोडलगत रहदारीच्या रस्त्यावर असतांना, सदर फिडर सातत्याने वीजपुरवठा खंडित होईल एवढे अतिसंवेदनशील कसे ? फिडरवरील वीजतारा वा अन्य सामुग्री जीर्ण झाली काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. तत्संबंधी उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी तथा सावदा विभागीय कार्यकारी अभियंता यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदरची समस्या कायमची धसास लावावी अशी जोरदार मागणी होत आहे.समस्या सोडवावीअहिरवाडी फिडरच्या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी वाघोडचे शिवसेना शाखा प्रमुख कमलेश पाटील व ग्रामस्यांनी केली आहे.