शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेती आता सातबारावरच, पुरानंतर उरले फक्त दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST

चाळीसगाव : कन्नड घाटातून उगम पावलेल्या डोंगरी नदीने ३१ ऑगस्ट रोजी रौद्ररूप धारण केले होते, दर दोन मिनिटाला तिची ...

चाळीसगाव : कन्नड घाटातून उगम पावलेल्या डोंगरी नदीने ३१ ऑगस्ट रोजी रौद्ररूप धारण केले होते, दर दोन मिनिटाला तिची पाणी पातळी पाच ते सात फुटांनी वाढत होती. पहाटे ४ वाजता नदी काठालगतच्या शेतातील पिकांसह मातीही वाहून गेल्याने आता फक्त दगड उरले आहे. यावर शेती करायची कशी? या प्रश्नाने शेतकरी हादरून गेले आहे. शासनाने नुसते पंचनामे न करता शेतांमध्ये मातीचा भराव टाकण्यासाठीही मदत दिली पाहिजे, असा टाहो विश्वजित दौलत बागुल या शेतकऱ्याने फोडला आहे.

‘लोकमत’ने पूरग्रस्त भागाचा आॕन दी स्पाॕट आढावा घेणे सुरू केले आहे. ३० व ३१ ऑगस्ट चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुराने वाकडी गावात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरापासून केवळ सहा किमी अंतरावर असणाऱ्या या गावात ३०ची रात्र आणि ३१ रोजीची पहाट ‘काळ’ बनून आली होती. याच गावात पुराच्या पाण्यात वाहिल्याने ६० वर्षीय कलाबाई सुरेश पांचाळ या महिलेचा मृत्यू झाला. दावणीला बांधलेल्या लहान-मोठ्या ३१४ गुरांनाही पुराच्या पाण्याने गिळून टाकले. पूर ओसरल्यानंतर त्याने दिलेल्या जखमा भयावह असून, अनेक शेतकरी उघडे पडले आहे. शेतकऱ्यांना सावरण्याची नितांत गरज आहे.

चौकट

अन् पाच जणांचा जीव फक्त वाचला

विश्वजित दौलत बागुल यांची रस्त्यालगत डोंगरी नदीच्या काठी दहा एकर शेती आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही. यावर्षी खरिपाची लागवड करताना त्यांनी कर्ज काढून नांगर जुंपला. कपाशी आणि मका पिकाची लागवड केली. मध्यंतरी पावसाने ओढ घेतल्याने पिकांची स्थिती जेमतेमच होती. शेतातच घर बांधून ते आपल्या पाच व सहा वर्षीय दोन मुली, २० वर्षांचा भाचा ३० वर्षीय पत्नी आणि ६० वर्षीय आईसोबत राहतात.

१...३० ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. ३१ रोजी पहाटे ४ वाजता विश्वजित यांच्या घराची एक भिंत कोसळून कंबरेपर्यंत आत पाणी शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण कुटुंब चांगलेच भांबावले. त्यांची पत्नी गरोदर आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यातून त्यांना पाच जणांचे जीव तेवढे वाचवता आले.

२...शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने फक्त दगड उरले असून, संसारही पुराच्या आक्राळ-विक्राळ जबड्यात नाहीसा झाला. विश्वजित व त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. आपली व्यथा सांगताना विश्वजित यांचे डोळेसारखे वाहत राहतात. वडील रडताहेत म्हणून चिमुकल्या मुलीही रडू लागतात. त्यांची वयोवृद्ध आईदेखील या अस्मानी प्रकोपाने हबकून गेली आहे. नदी काठालगत असणाऱ्या शेतींची अशीच वाताहत झाली असून, दीडशे एकरवरील पिके पुरात स्वाहा झाली आहेत.

चौकट

शेती तयार करण्यासाठी मदत द्यावी पिकांसह मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा शेती तयार करण्यासाठीही शासनाने मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

-पुन्हा शेती तयार करण्यासाठी शेतांमध्ये दोन ते अडीच फूटापर्यंत धरणातील किंवा नदीचा गाळ टाकावा लागणार आहे. मातीचा भरावही करावा लागणार आहे. त्यामुळे पुरातून सावरायचे की शेती तयार करायची? अशा कात्रीत शेतकरी सापडले आहे.

इन्फो

पुरातून कसाबसा जीव वाचविता आला. फक्त अंगावरील कपडे तेवढे उरले आहे. आम्ही उघडे पडलो आहोत. पंचनाम्यांसोबतच आमची शेती पुन्हा तयार करण्यासाठीही मदत मिळणे जास्त गरजेचे आहे. जमिनीचे कागदपत्रेही पुरात वाहून गेली आहे.

-विश्वजीत दौलत बागूल, पूरग्रस्त शेतकरी, वाकडी ता. चाळीसगाव.

040921\04jal_5_04092021_12.jpg~040921\04jal_6_04092021_12.jpg

वाकडी ता. चाळीसगाव येथील विश्वजीत बागूल यांच्या शेतात आता दगड तेवढे उरले असून घरीही जमीनदोस्त झाले आहे. (छाया : जिजाबराव वाघ)~वाकडी ता. चाळीसगाव येथील विश्वजीत बागूल यांच्या शेतात आता दगड तेवढे उरले असून घरीही जमीनदोस्त झाले आहे. (छाया : जिजाबराव वाघ)