शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

घरकुलांसाठी शेतमजूर युनियनची जि.प.वर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात येत असतानाही गरजू, गरीब मजुरांना अद्यापही अनुदान मिळाले नसून या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात येत असतानाही गरजू, गरीब मजुरांना अद्यापही अनुदान मिळाले नसून या दीड लाख अनुदान तातडीने मिळावे, यासह विविध मागण्यासांठी शेतमजूर युनियअनतर्फे (लाल बावटा)जि.प.वर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. विविध ठिकाणचे ५० लाभार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.

बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून हा मोर्चा काढण्यात आला. यात असोदा, ममुराबाद, विटनेर, बांबरूड राणीचे, आमखेडा, म्हसावद आदी गावांमधील पाच ते दहा लाभार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. सर्व गरीब मजुरांना निवासी प्रयोजनांसाठी ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करा, घरकूल बांधकामासाठी दीड लाख रु. अनुदान द्या, महाआवास अभियान यशस्वीरित्या राबवावे, शेतमजुरांना मनरेगा अंतर्गत कामे द्या, बेरोजगार भत्ता मिळावा, मनरेगा अंतर्गत अर्ज स्वीकारून पोचपावती देण्याचे ग्रामसेवकांना आदेश द्यावे, अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. दरम्यान, या मागण्या मान्य न झाल्यास जनतेच्या असंतोषास तोंड द्यावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. विनोद अढाळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉ. प्रकाश चौधरी, वसंत पाटील, विश्वनाथ मिस्तरी, रंजना कोळी, लोटन पाटील, गोकूळ कोळी, कल्पना खैरनार, जया कोळी, मंगला सोनवणे, सुरेखा कोळी, निजाम तडवी, गुलजार तडवी, प्रिया कोळी, भानुदास भिल, मनीषा कोळी, सुमन कोळी, शकुंतला खैरनार, गयाबाई बेलदार, सबजान ताडवी, शिवाजी सुतार, उषाबाई मिस्तरी आदींच्या निवदेनावर स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो : ११ सीटीआर ०६