शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक आणि पदाधिकाºयांमध्ये बाचाबाची

By admin | Updated: February 8, 2017 00:08 IST

चाळीसगाव : अनधिकृत कामामुळे दुकानदारी अडथळा येत असल्याची कैफियत घेवून गेलेल्या दुकानदारांना पालिकेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पालिका गेटसमोर ७ रोजी सकाळी ‘कपडे काढा’ आंदोलन

चाळीसगाव : नगरपालिकेच्या अनधिकृत कामामुळे दुकानदारी अडथळा येत असल्याची कैफियत  घेवून गेलेल्या दुकानदारांना पालिकेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अचानक त्यांनी पालिका गेटसमोर ७ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान  पालिकेचे गेट बंद करुन ‘कपडे काढा’ आंदोलन करीत खळबळ उडवून दिली. या दरम्यान पालिकेतील पदाधिकारी दाखल झाल्याने दुकानदार व त्यांच्यात बाचाबाची होवून पालिकेतील वातावरण चांगलेच तापले. या प्रकाराबाबत दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, भडगाव रोडवरील एलआयसी आॅफिस जवळ जेसीबी मशीनने गटारीसाठी मोठी चारी खणली आहे, गेल्या सहा दिवसापासून कामाची स्थिती तशीच असल्याने येथील दुकानांमध्ये ये-जा करण्यासाठीचा रस्ता बंद झाला आहे, याचा परिणाम व्यवसायावर होवून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत ६ रोजी नगरपालीकेला व्यावसायिकानी निवेदन देवुन  चारीत पाईप टाकून गटारीचे काम पूर्ण करावे  अशी मागणी केली होती.  मात्र दखल न घेतल्याने ७-८ दुकानदारांनी ७ रोजी पालिका गाठली. याठिकाणी मुख्याधिकारी श्रीकुष्ण भालसिग व बांधकाम अभियंता राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन गटारीचे काम केव्हा  होणार असल्याची  विचारणा त्यांनी केली असता मुख्याधिकारी यांनी या कामाची कुठलीच माहिती नसल्याचे सांगताच दुकानदार संतप्त  झाले.  हे काम अनधिकृत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे असून पालीकेच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी दुकानदारांनी गेटसमोर समोरच कपडे काढा आंदोलन केले. ही बाब कानावर येताच पालिका सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी, भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील आदी पदाधिकारी आंदोलन स्थळी आले. यावेळी पदाधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दाखल झालेल्या पोलिसांसमोर आंदोलक व पदाधिकाºयांमध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान घृष्णेश्वर पाटील यांनी संयमी भूमिका घेत तातडीने पाईप टाकण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.  या आंदोलनात  खुशाल पाटील, पप्पू पाटील यांचेसह ७-८ दुकानदार सहभागी झाले होते. तसेच आंदोलनाला रयत सेनेचे गणेश पवार व पदाधिकाºयांनी पाठिंबा दर्शवत होणाºया अन्ययाबाबत पदाधिकाºयांना जाब विचारला आणि होणारी गैरसोय  दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)पालिका मुख्याधिकारी दालनात भानुदास मराठे (भावडू), खुशाल पाटील, गणेश पवार व इतर चार ते पाच जणांनी अरेरावी करीत उर्मटपणाची भाषा वापरुन शिवीगाळ केली. नंतर मुख्याधिकार श्रीकृष्ण भालसिंग हे दालनातून निघून गेले. असता वरील सर्व व्यक्तीनीपालिकेचे मुख्य गेट बंद करुन ये- जा करणारे कर्मचारी व नागरिकांचा रस्ता अडविला. तसेच कर्मचाºयांना कोंडून ठेवले. अंगावरील कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद वर्तन केले म्हणून चाळीसगाव पोलिसात वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे.आंदोलकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - राजेंद्र चौधरीशहरातील एलआयसी कार्यालय परिसरातील गटार तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरुन पाणी वाहात होते. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यासाठी त्या गटारीचे काम सुरु केले होते. सुट्टी व आचारसंहितेच्या कामामुळे दोन दिवस पाईप उशीरा आले. आम्हाला विकासासाठी लोकांनी निवडून दिले आहे. केवळ राजकारण करुन कर्मचाºयांवर दहशत  निर्माण करुन अर्धनग्न केलेला हा प्रकार पूर्णत: चुकीचा होता. विकासाचे काम करताना अशा प्रकारच्या कोणत्याही विरोधाला आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी आंदोलनाबाबत व्यक्त केली. तसेच नागरिकांनी चांगल्या कामांसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.