शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

विमा कालावधी संपल्यानंतर कृषी विभागाला आली केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग

By ajay.patil | Updated: August 18, 2023 14:45 IST

वर्षभर केळी असताना, ५० टक्के क्षेत्राची पडताळणी : ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा सूचना.

जळगाव - हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतंर्गत केळी लागवड नसताना, काही शेतकऱ्यांनी केळी लागवड केल्याचे दाखवत विमा काढला होता. याबाबत कृषी विभागाने काही महिन्यांपुर्वी चौकशीचे आदेश देऊन क्षेत्र पडताळणी केली होती. मात्र, तेव्हा कृषी विभाग व विमा कंपनीकडून पुर्ण पडताळणी झाली नाही. आता विमा कालावधी संपल्यानंतर मात्र कृषी विभाग व विमा कंपनीला केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग आली आहे.

३१ जुलैपर्यंत पीक विम्याचा कालावधी असतो. हा कालावधी संपल्यानंतरच कृषी विभागाला केळीचे क्षेत्र पडताळणीचे जाग कशी आली ? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  ज्यावेळी कृषी विभागाकडून ही पडताळणी करणे गरजेचे होते. तेव्हा अपुर्ण क्षेत्राची पडताळणी केली. आता ज्यावेळी विमा कालावधी संपला आहे व विम्याची रक्कम देण्याची वेळ येत आहे. तेव्हाच कृषी विभाग व विमा कंपनीकडून क्षेत्र पडताळणी करण्याची जाग का आली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता पडताळणी करुन उपयोग काय..?

१. शेतकऱ्यांनी विमा काढला तेव्हा, विमा कंपनीने पीकांची पडताळणी न करताच विमा हप्ता का घेतला.२. तेव्हाच विमा कंपनीला पीकाची पडताळणी करण्याचे शहाणपण का सुचले नाही ?३. आता पीक पडताळणी केली तर त्या ठिकाणी केळीचे पीक राहील, याची शक्यता कमीच. कारण, बहुतांश शेतकऱ्यांची केळी कटाई झाली आहे.४. आता अंदाजे पीक पडताळणी करून, शेतकऱ्यांचे नुकसान करून केवळ विमा कंपनीचाच फायदा होणार आहे.