शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

विमा कालावधी संपल्यानंतर कृषी विभागाला आली केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग

By ajay.patil | Updated: August 18, 2023 14:45 IST

वर्षभर केळी असताना, ५० टक्के क्षेत्राची पडताळणी : ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा सूचना.

जळगाव - हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतंर्गत केळी लागवड नसताना, काही शेतकऱ्यांनी केळी लागवड केल्याचे दाखवत विमा काढला होता. याबाबत कृषी विभागाने काही महिन्यांपुर्वी चौकशीचे आदेश देऊन क्षेत्र पडताळणी केली होती. मात्र, तेव्हा कृषी विभाग व विमा कंपनीकडून पुर्ण पडताळणी झाली नाही. आता विमा कालावधी संपल्यानंतर मात्र कृषी विभाग व विमा कंपनीला केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग आली आहे.

३१ जुलैपर्यंत पीक विम्याचा कालावधी असतो. हा कालावधी संपल्यानंतरच कृषी विभागाला केळीचे क्षेत्र पडताळणीचे जाग कशी आली ? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  ज्यावेळी कृषी विभागाकडून ही पडताळणी करणे गरजेचे होते. तेव्हा अपुर्ण क्षेत्राची पडताळणी केली. आता ज्यावेळी विमा कालावधी संपला आहे व विम्याची रक्कम देण्याची वेळ येत आहे. तेव्हाच कृषी विभाग व विमा कंपनीकडून क्षेत्र पडताळणी करण्याची जाग का आली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता पडताळणी करुन उपयोग काय..?

१. शेतकऱ्यांनी विमा काढला तेव्हा, विमा कंपनीने पीकांची पडताळणी न करताच विमा हप्ता का घेतला.२. तेव्हाच विमा कंपनीला पीकाची पडताळणी करण्याचे शहाणपण का सुचले नाही ?३. आता पीक पडताळणी केली तर त्या ठिकाणी केळीचे पीक राहील, याची शक्यता कमीच. कारण, बहुतांश शेतकऱ्यांची केळी कटाई झाली आहे.४. आता अंदाजे पीक पडताळणी करून, शेतकऱ्यांचे नुकसान करून केवळ विमा कंपनीचाच फायदा होणार आहे.