शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विमा कालावधी संपल्यानंतर कृषी विभागाला आली केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग

By ajay.patil | Updated: August 18, 2023 14:45 IST

वर्षभर केळी असताना, ५० टक्के क्षेत्राची पडताळणी : ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा सूचना.

जळगाव - हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतंर्गत केळी लागवड नसताना, काही शेतकऱ्यांनी केळी लागवड केल्याचे दाखवत विमा काढला होता. याबाबत कृषी विभागाने काही महिन्यांपुर्वी चौकशीचे आदेश देऊन क्षेत्र पडताळणी केली होती. मात्र, तेव्हा कृषी विभाग व विमा कंपनीकडून पुर्ण पडताळणी झाली नाही. आता विमा कालावधी संपल्यानंतर मात्र कृषी विभाग व विमा कंपनीला केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग आली आहे.

३१ जुलैपर्यंत पीक विम्याचा कालावधी असतो. हा कालावधी संपल्यानंतरच कृषी विभागाला केळीचे क्षेत्र पडताळणीचे जाग कशी आली ? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  ज्यावेळी कृषी विभागाकडून ही पडताळणी करणे गरजेचे होते. तेव्हा अपुर्ण क्षेत्राची पडताळणी केली. आता ज्यावेळी विमा कालावधी संपला आहे व विम्याची रक्कम देण्याची वेळ येत आहे. तेव्हाच कृषी विभाग व विमा कंपनीकडून क्षेत्र पडताळणी करण्याची जाग का आली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता पडताळणी करुन उपयोग काय..?

१. शेतकऱ्यांनी विमा काढला तेव्हा, विमा कंपनीने पीकांची पडताळणी न करताच विमा हप्ता का घेतला.२. तेव्हाच विमा कंपनीला पीकाची पडताळणी करण्याचे शहाणपण का सुचले नाही ?३. आता पीक पडताळणी केली तर त्या ठिकाणी केळीचे पीक राहील, याची शक्यता कमीच. कारण, बहुतांश शेतकऱ्यांची केळी कटाई झाली आहे.४. आता अंदाजे पीक पडताळणी करून, शेतकऱ्यांचे नुकसान करून केवळ विमा कंपनीचाच फायदा होणार आहे.