शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षानंतरही 80 किलोमीटरचे कामअर्धवटच

By admin | Updated: May 25, 2017 17:00 IST

सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग दुहेरीकरण

ऑनलाईन लोकमत/ रमाकांत पाटील 
नंदुरबार, दि.25- पश्चिम रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या आदिवासी भागाला जोडणारा सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रचंड प्रतीक्षेनंतर सुरू तर झाले पण हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने गेल्या नऊ वर्षात एकूण 306 किलोमीटरपैकी अद्यापर्पयत 225 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाने या मार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याने कामाचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे या कामाचा खर्च वाढतच असल्याने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा व आदिवासी पट्टय़ातील विकासाला चालना देणारा सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग तयार होऊन 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. या मार्गाचे महत्त्व व त्यातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता त्याचे दुहेरीकरण करण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून सुरू होती. 1992-93 मध्ये या मार्गाला मंजुरी देवून त्याकाळी सात कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. तथापि ऐनवेळी हा निधी कोकण रेल्वेकडे वळविल्याने हे काम मागे पडले. त्यानंतर या भागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मागणीचा दबाव वाढला. 
10 जानेवारी 2008 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या दुहेरीकरणाला मंज़ुरी देण्यात आली. त्यानुसार उधना ते जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी  712 कोटी 60 लाख रुपये प्रकल्पाच्या किमतीला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी पहिल्यांदा 2008-09 च्या रेल्वे अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा निधी तेव्हा पुरेसा खर्च झाला होता. त्यानंतर पुढील वर्षातही जेमतेम 30 कोटींची तरतूद दरवर्षी होत राहिली. वास्तविक या मार्गाचे काम पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, पुरेसा निधी मिळाला नसल्याने काम रेंगाळले त्यामुळे रस्त्याच्या कामाची किंमतही सुमारे 500 कोटींनी वाढली आहे. सद्यस्थितीत व्यारा ते सोनगड व सोनगड ते चिंचपाडार्पयतचे काम पूर्ण झाले आहे. धरणगाव ते बेटावदर्पयतचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. अमळनेर ते होळ या मार्गाचे कामही पूर्ण होऊन त्याचे इन्स्पेक्शन नुकतेच करण्यात आले. महिनाभरात या मार्गावरील वाहतूकही सुरू होईल. तथापि, चलठाण ते उधना, होळ ते नंदुरबार आणि पाळधी ते जळगाव या तीन टप्प्यातील जवळपास 80 किलोमीटरपेक्षा अधिक कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामांसाठी निधी मिळाल्यास कामाला गती मिळू शकेल. यापूर्वीच या प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अजून विलंब झाल्यास खर्च वाढेल. त्यामुळे या कामाला आता गती देऊन किमान मार्च 2018 र्पयत हा रेल्वेमार्ग एकदाचा पूर्ण दुहेरी करावा, अशी अपेक्षा आहे.