शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

नऊ वर्षानंतरही 80 किलोमीटरचे कामअर्धवटच

By admin | Updated: May 25, 2017 17:00 IST

सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग दुहेरीकरण

ऑनलाईन लोकमत/ रमाकांत पाटील 
नंदुरबार, दि.25- पश्चिम रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या आदिवासी भागाला जोडणारा सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रचंड प्रतीक्षेनंतर सुरू तर झाले पण हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने गेल्या नऊ वर्षात एकूण 306 किलोमीटरपैकी अद्यापर्पयत 225 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाने या मार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याने कामाचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे या कामाचा खर्च वाढतच असल्याने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा व आदिवासी पट्टय़ातील विकासाला चालना देणारा सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग तयार होऊन 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. या मार्गाचे महत्त्व व त्यातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता त्याचे दुहेरीकरण करण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून सुरू होती. 1992-93 मध्ये या मार्गाला मंजुरी देवून त्याकाळी सात कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. तथापि ऐनवेळी हा निधी कोकण रेल्वेकडे वळविल्याने हे काम मागे पडले. त्यानंतर या भागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मागणीचा दबाव वाढला. 
10 जानेवारी 2008 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या दुहेरीकरणाला मंज़ुरी देण्यात आली. त्यानुसार उधना ते जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी  712 कोटी 60 लाख रुपये प्रकल्पाच्या किमतीला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी पहिल्यांदा 2008-09 च्या रेल्वे अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा निधी तेव्हा पुरेसा खर्च झाला होता. त्यानंतर पुढील वर्षातही जेमतेम 30 कोटींची तरतूद दरवर्षी होत राहिली. वास्तविक या मार्गाचे काम पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, पुरेसा निधी मिळाला नसल्याने काम रेंगाळले त्यामुळे रस्त्याच्या कामाची किंमतही सुमारे 500 कोटींनी वाढली आहे. सद्यस्थितीत व्यारा ते सोनगड व सोनगड ते चिंचपाडार्पयतचे काम पूर्ण झाले आहे. धरणगाव ते बेटावदर्पयतचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. अमळनेर ते होळ या मार्गाचे कामही पूर्ण होऊन त्याचे इन्स्पेक्शन नुकतेच करण्यात आले. महिनाभरात या मार्गावरील वाहतूकही सुरू होईल. तथापि, चलठाण ते उधना, होळ ते नंदुरबार आणि पाळधी ते जळगाव या तीन टप्प्यातील जवळपास 80 किलोमीटरपेक्षा अधिक कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामांसाठी निधी मिळाल्यास कामाला गती मिळू शकेल. यापूर्वीच या प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अजून विलंब झाल्यास खर्च वाढेल. त्यामुळे या कामाला आता गती देऊन किमान मार्च 2018 र्पयत हा रेल्वेमार्ग एकदाचा पूर्ण दुहेरी करावा, अशी अपेक्षा आहे.