शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महावितरणनंतर बीएसएनएलच्या ग्राहकांचीही टेलिफोन बिल भरण्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

दुर्लक्ष : जिल्हाभरात चार हजार ग्राहकांकडे थकबाकी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे अवाजवी वीजबिल असल्याच्या तक्रारी करत महावितरणच्या ...

दुर्लक्ष : जिल्हाभरात चार हजार ग्राहकांकडे थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे अवाजवी वीजबिल असल्याच्या तक्रारी करत महावितरणच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, दुसरीकडे बीएसएनएलच्या ग्राहकांनीही टेलिफोन बिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात सध्या २८ हजार ग्राहकांपैकी चार हजार ग्राहकांकडे टेलिफोन बिलाची थकबाकी असल्याचे बीएसएनएलचे जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक संजय केशरवाणी यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत मोबाइलची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे घरगुती टेलिफोन ग्राहकांची संख्या २५ टक्क्यांवर आली आहे. त्यातही बहुतांश ग्राहक विविध सरकारी कार्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, बँका व काही घरगुती नागरिकांकडेच टेलिफोनचा वापर सुरू आहे. जिल्ह्यात एकेकाळी दोन लाखांवर असलेली बीएसएनएल ग्राहकांची मोबाइलमुळे सध्या २८ हजार ग्राहकांवर आली आहे. तर येत्या काही वर्षांत ती संख्याही कमी होणार असल्याची भीती बीएसएनएलतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या ग्राहक दर महिन्याला येणारे टेलिफोन बिलही भरत नसल्यामुळे तोट्यात असणारे बीएसएनएल अधिकच तोट्यात जात आहे. जे ग्राहक नोटीस बजावूनही बिल भरत नाही,अशा ग्राहकांचे सुरुवातीच्या पंधरा दिवसांत ''आउटगोइंग'' व नंतर ''इनकमिंग'' कनेक्शन कट करण्यात येत आहे. दर महिन्याला असे बिल न भरणारे ३०० ते ३५० ग्राहकांचे कनेक्शन कट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

ऑप्टिकल फायबर कनेक्शनला मागणी वाढली

सध्या कोरोना काळात अनेक नोकरदार वर्गाचे घरी बसून काम सुरू आहे. त्यामुळे जलदगतीच्या इंटरनेटसाठी नागरिकांकडून ऑप्टिकल फायबर कनेक्शनची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात ऑप्टिकल फायबर कनेक्शनचे पाच ते सहा हजात कनेक्शन वाढले असल्याचेही केशववाणी यांनी सांगितले.