शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

महावितरणनंतर बीएसएनएलच्या ग्राहकांचीही टेलिफोन बिल भरण्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

दुर्लक्ष : जिल्हाभरात चार हजार ग्राहकांकडे थकबाकी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे अवाजवी वीजबिल असल्याच्या तक्रारी करत महावितरणच्या ...

दुर्लक्ष : जिल्हाभरात चार हजार ग्राहकांकडे थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे अवाजवी वीजबिल असल्याच्या तक्रारी करत महावितरणच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, दुसरीकडे बीएसएनएलच्या ग्राहकांनीही टेलिफोन बिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात सध्या २८ हजार ग्राहकांपैकी चार हजार ग्राहकांकडे टेलिफोन बिलाची थकबाकी असल्याचे बीएसएनएलचे जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक संजय केशरवाणी यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत मोबाइलची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे घरगुती टेलिफोन ग्राहकांची संख्या २५ टक्क्यांवर आली आहे. त्यातही बहुतांश ग्राहक विविध सरकारी कार्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, बँका व काही घरगुती नागरिकांकडेच टेलिफोनचा वापर सुरू आहे. जिल्ह्यात एकेकाळी दोन लाखांवर असलेली बीएसएनएल ग्राहकांची मोबाइलमुळे सध्या २८ हजार ग्राहकांवर आली आहे. तर येत्या काही वर्षांत ती संख्याही कमी होणार असल्याची भीती बीएसएनएलतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या ग्राहक दर महिन्याला येणारे टेलिफोन बिलही भरत नसल्यामुळे तोट्यात असणारे बीएसएनएल अधिकच तोट्यात जात आहे. जे ग्राहक नोटीस बजावूनही बिल भरत नाही,अशा ग्राहकांचे सुरुवातीच्या पंधरा दिवसांत ''आउटगोइंग'' व नंतर ''इनकमिंग'' कनेक्शन कट करण्यात येत आहे. दर महिन्याला असे बिल न भरणारे ३०० ते ३५० ग्राहकांचे कनेक्शन कट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

ऑप्टिकल फायबर कनेक्शनला मागणी वाढली

सध्या कोरोना काळात अनेक नोकरदार वर्गाचे घरी बसून काम सुरू आहे. त्यामुळे जलदगतीच्या इंटरनेटसाठी नागरिकांकडून ऑप्टिकल फायबर कनेक्शनची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात ऑप्टिकल फायबर कनेक्शनचे पाच ते सहा हजात कनेक्शन वाढले असल्याचेही केशववाणी यांनी सांगितले.