शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कर्करोगाला हरविले अन् उमेदीने कार्यक्रमाला आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गौरव समारंभ तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गौरव समारंभ तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वर्षभरापूर्वीच मुख कर्करोगावर मात करून वैद्यकीय सेवेत रुजू झालेल्या जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जयकर यांची या कार्यक्रमातील उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी अधिष्ठात डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

गुटखा, तंबाखू यासारख्या अमली पदार्थाना लांब ठेवले तरच आपण 'कॅन्सर'ला 'कॅन्सल' म्हणू शकतो, असे प्रतिपादन डॉ.रामानंद यांनी केले. तर डॉ. जयकर हे कर्करोगाला हरवतीलच, असा आम्हाला विश्वास होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. यू.बी. तासखेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. इम्रान पठाण, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता भालेराव, अधिसेविका कविता नेतकर, जिल्हा मौखिक अधिकारी संपदा गोस्वामी उपस्थित होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत ठाकूर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. स्वप्नजा तायडे, रुचिका साळुंखे, सामाजिक कार्यकर्ता राहुल बऱ्हाटे, समुपदेशक निशा कढरे यांनी परिश्रम घेतले.

यांचा सत्कार

यावेळी कर्करोगमुक्त झालेल्या राजमोहम्मद शिकलगर यांचा सत्कार करण्यात आला. तर रांगोळी स्पर्धेत प्रथम- अंकिता अहिरे, द्वितीय - आरती गावंडे, तृतीय - ज्ञानेश्वरी बोरकर यांनी यश मिळविले. त्यांचाही सन्मान करण्यात आला.

दोन महिन्यात दोन शस्त्रक्रिया

निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. विलास जयकर यांना जिभेचा कर्करोग असल्याचे २०१९ मध्ये निदान झाले होते. २३ सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर लागलीच त्यांच्या दाताच्या खालच्या भागाला सूज येत असल्याने पुन्हा त्या ठिकाणी कर्करोगाचे निदान झाले. १४ नोव्हेंबरला ही दुसरी शस्त्रक्रिया झाली. फेब्रुवारी २०२० मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.

फोटो कॅप्शन नं ५ सीटीआर ३१

रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करताना डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. एन.एस. चव्हाण, डॉ. विलास जयकर, डॉ. यू. बी. तासखेडकर, डॉ. इम्रान पठाण, कविता नेरकर.