शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

कळमोदे येथे शुभारंभानंतर तासाभरातच रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:00 IST

कळमोदा, ता.रावेर येथील शेतकरी तथा ग्रामस्थ काशिनाथ बाबूराव पाटील यांनी कळमोदा ते फैजपूर हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला, मात्र ग्रामस्थांच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले,

ठळक मुद्देग्रामस्थांच्या आनंदावर क्षणात विरजण१० दिवसांनंतर काम सुरू होणार असल्याचे दिले पत्र

फैजपूर जि.जळगाव : कळमोदा, ता.रावेर येथील शेतकरी तथा ग्रामस्थ काशिनाथ बाबूराव पाटील यांनी कळमोदा ते फैजपूर हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला, मात्र ग्रामस्थांच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले, कारण कुठे माशी शिंकली व तासाभरात रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’ लागला व काम थांबवून आलेले अधिकारी व कामगार हे यंत्रसामग्रीसह आपला गाशा गुंडाळून तेथून निघून गेले.आता हे काम १० दिवसांनंतर सुरू होईल, असे पत्र दुसऱ्या दिवशी देण्यात आले आहे. मात्र काशिनाथ पाटील यांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास आपण १८ आॅक्टोबरला आत्मदहन करूच, असा निश्चय केला.कळमोदा ते फैजपूर हा रस्ता गेल्या चार पाच वर्षांपासून खराब झाला असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्ता खराब असल्याने कळमोदा ग्रामस्थांनी फैजपूर शहराशी व्यवहारसुद्धा बंद केलेले आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी १८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काशिनाथ पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेमार्फत १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी मागवलेल्या यंत्रसामुग्रीचे पूजन उपसरपंच वासुदेव बाक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र या आनंदावर क्षणात विरजण पडले, कुठे माशी शिंकली, हे कळू शकले नाही व एका तासात रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला व उपस्थित अधिकारी यांनी यंत्रसामग्रीसह कळमोदा रस्त्यावरून काढता पाय घेतला. मात्र सुरू झालेले काम का बंद झाले, याचे उत्तर ते देऊ शकले नाही.दुसºया दिवशी बांधकाम विभागातर्फे पत्रदरम्यान, ११ रोजी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काशिनाथ पाटील यांना पत्र देऊन रस्त्याचे काम १० दिवसांनंतर सुरू करण्यात येईल. तरी आपण आत्मदहन करू नये, अशी विनंती केली, पण काशिनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दिनांक आपण १८ रोजी आत्मदहन करणारच व आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणFaizpurफैजपूर