शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

खासगी मक्तेदाराच्या अपयशानंतर, आता आयआरटीसी मैदानात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

जळगाव : तीन वर्षांपूर्वी आयआरटीसीने खासगी मक्तेदारामार्फत येथील रेल्वे स्थानकावर कॅन्टिनची उभारणी केली होती. मात्र, अत्यंत महागड्या पदार्थांमुळे प्रवाशांचा ...

जळगाव : तीन वर्षांपूर्वी आयआरटीसीने खासगी मक्तेदारामार्फत येथील रेल्वे स्थानकावर कॅन्टिनची उभारणी केली होती. मात्र, अत्यंत महागड्या पदार्थांमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने वर्षभरातच हे कॅन्टिन गुंडाळण्यात आले. कॅन्टिन चालविण्यात खासगी मक्तेदार अपयशी ठरल्यानंतर आता ‘आयआरटीसी’ने घरगुती पद्धतीचे जेवण ठेवण्याचा निर्णय घेऊन स्वत: कॅन्टिन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळप्रमाणे जळगाव रेल्वे स्थानकावरही बहुतांश गाड्यांना थांबा आहे. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असल्याने रात्रभर प्रवाशांची वर्दळ असते. दरम्यान, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना किंवा गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात घरगुती पद्धतीचे जेवण मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे प्रवाशांची ही गरज भागविण्यासाठी ‘आयआरटीसी’तर्फे रेल्वे स्थानकावर कॅन्टिनची उभारणी करण्यात येत आहे. प्लॅटफार्म क्रमांक तीनवर कॅन्टिनचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, यानंतर फर्निचरचे काम हाती घेण्यात येणार आहे. मार्चअखेर प्रवाशांच्या सेवेत कॅन्टिनची सुविधा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

घरगुती पद्धतीचे मिळणार जेवण :

रेल्वे प्रशासनातर्फे या कॅन्टिनमध्ये वडापाव, समोसा, इडली, भजी, चहा, विविध प्रकारची थंड पेये, बिस्किटे यासह घरगुती पद्धतीचे भाजी-पोळीचे जेवणही मिळणार आहे. प्रवासातील नागरिकांना आयआरटीसीच्या वेबसाईटवरून जेवणाची आर्डर दिल्यानंतर जळगाव स्थानक येईपर्यंत तयार जेवण मिळणार आहे. विशेष म्हणजे पार्सलची सुविधाही देण्यात येणार आहे. दरम्यान, कॅन्टिनवरील इतर पदार्थ व जेवणाचे दर काय असणार, याबाबत सध्या माहिती नसल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

यापूर्वीचे कॅन्टिन वर्षभरातच बंद :

जळगाव रेल्वे स्थानकावर तीन वर्षांपूर्वी खासगी मक्तेदारामार्फतच प्लॅटफार्म क्रमांक तीनवरच एक कॅन्टिन उभारण्यात आले होते. सुरूवातीला या कॅन्टिनला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, येथील अन्न पदार्थ महागडे असल्यामुळे कालांतराने प्रवाशांनी या कॅन्टिनकडे पाठ फिरवली. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे कॅन्टिन वर्षभरातच बंद पडले होते. तर आता नवीन कॅन्टिनही याच जागेवर उभारण्यात येत आहे.