शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

शेतात दारु पिण्यास बसल्यावरुन कासोद्यात दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:16 IST

गुन्हा दाखल : १३ जणांना अटक

कासोदा- माझ्या जागेत दारु पिण्यास का बसले याचा जाब विचारुन रिकाम्या बाटल्या उचलायला लावल्याच्या कारणावरुन येथे .५ च्या रात्री दोन गट एकमेकांना भीडले. मोठा जमाव एका इमारती जवळ गोळा झाल्याने तणाव वाढला होता,मात्र तात्काळ पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला आहे.दोन्ही गटांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल होऊन १३ जणांना अटक करण्यात आली आहे.५ रोजी रात्री तळई रस्त्यावरील शेतात काही जण दारू पीत बसले होते,शेतमालक वाल्मिक देविदास समशेर यांनी त्यांना हटकले व दारुच्या रिकाम्या बाटल्या उचलून फेकावयास लावल्या, आम्ही ज्या बाटल्या पिलो त्याच फेकू,आधीच्या पडलेल्या फेकणार नाही, यावरुन वाद वाढला व वादाचे रुपांतर मारामारीत झाले. हा वाद पुन्हा घरी आल्यावर वाढला पण यावेळी समशेर यांच्या इमारतीजवळ मोठा जमाव जमला. इमारतीच्या दरवाजा व खिडक्यांंना दगड मारुन काचा फोडल्या, यावरून गावात अफवा पसरल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वाल्मिक देविदास समशेर यांच्या फियार्दीवरून भादंविक १४३, १४७, १४९, ३३६, ३२३, ५०४, ४२७, १८८,सह जमावबंदीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन इरफान मन्सूफ खान,अजमल मुक्तार खान,सह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इरफान खान मुन्सब खान यांच्या फियार्दीवरून वाल्मिक देविदास समशेर, गणेश बाबूलाल अहिरे सह एकूण ५ जणांना अटक केली आहे. सहाय्यक फौजदार सहदेव घुले व पो.नाईक युवराज कोळी हे पुढील तपास करीत आहेत.या घटनेनंतर चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी घटनास्थळी भेंट देऊन शांतता समितीची तातडीने बैठक घेतली. यावेळी एपीआय रवींद्र जाधव,पीएसआय नरेश ठाकरे, हिंमत पाटील, भैय्या राक्षे,रवींद्र चौधरी मुक्तार पंजाबी,समद कुरेशी सह काही नागरिकांशी संवाद साधला व शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे.पण दारुमुळे जर संपूर्ण गावाची शांतता धोक्यात येत असेल तर संबंधीतांनी जास्त कठोर होणे गरजेचे आहे, अशी चर्चा गावात होत आहे.