शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जळगाव शहरात आईचा मृत्यू झाल्यानंतरही मुलगा फिरकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:28 IST

चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. घर मालक व अन्य लोकांनी बाहेर गेलेल्या मुलाला या घटनेची माहिती दिली, परंतु शनिवारी सायंकाळपर्यंतही तो आईच्या मृतदेहाजवळ आला नाही.

ठळक मुद्दे रायपूर येथील घटनाघरमालकाकडून नातेवाईकांचा शोध चार दिवसापूर्वीच आले वास्तव्याला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ : चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. घर मालक व अन्य लोकांनी बाहेर गेलेल्या मुलाला या घटनेची माहिती दिली, परंतु शनिवारी सायंकाळपर्यंतही तो आईच्या मृतदेहाजवळ आला नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायाबाई व त्यांचा मुलगा याच आठवड्यात रायपुर येथे वास्तव्याला आले.राजू बिसनसिंग परदेशी यांच्या मालकीच्या घरात ते भाड्याने राहू लागले. पहिल्या दिवसापासून ही महिला आजारी होती. मुलगा सेंट्रींगचे काम करतो, मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो कधी घरी येतो तर कधी येतही नाही. शुक्रवारी रात्री मायाबाई यांंना घरीच रक्ताची उलटी झाली. त्या बेशुध्दावस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर घर मालकाने मुलाशी संपर्क केला, मात्र तेव्हा झाला नाही. त्यामुळे या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.याबाबत एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. हेडकॉन्स्टेबल दिनकर खैरनार यांनी जिल्हा रुग्णालयात जावून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. नातेवाईकांची चौकशी केली असता फारशी माहिती मिळाली नाही.  मृतदेह जिल्हा रुग्णालयात   त्यामुळे मृतदेह शवागार गृहात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आईचा मृत्यू झाल्याबाबत घर मालक व अन्य लोकांनी मुलाला फोनद्वारे कळविले, परंतु त्याने ऐकून घेतले, परंतु रात्रीतून किंवा दुसºया दिवशीही तो रुग्णालयात किंवा घरी आला नाही. नंतर मात्र त्याच्याशीही संपर्क झाला नाही. भुसावळ येथे खडका चौक परिसरात मायाबाई यांचे जवळचे नातेवाईक राहत असल्याची माहिती मिळाली आहे. घर मालक तेथे चौकशीसाठी गेल्याची माहिती खैरनार यांनी दिली.