शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जळगाव शहरात आईचा मृत्यू झाल्यानंतरही मुलगा फिरकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:28 IST

चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. घर मालक व अन्य लोकांनी बाहेर गेलेल्या मुलाला या घटनेची माहिती दिली, परंतु शनिवारी सायंकाळपर्यंतही तो आईच्या मृतदेहाजवळ आला नाही.

ठळक मुद्दे रायपूर येथील घटनाघरमालकाकडून नातेवाईकांचा शोध चार दिवसापूर्वीच आले वास्तव्याला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ : चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. घर मालक व अन्य लोकांनी बाहेर गेलेल्या मुलाला या घटनेची माहिती दिली, परंतु शनिवारी सायंकाळपर्यंतही तो आईच्या मृतदेहाजवळ आला नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायाबाई व त्यांचा मुलगा याच आठवड्यात रायपुर येथे वास्तव्याला आले.राजू बिसनसिंग परदेशी यांच्या मालकीच्या घरात ते भाड्याने राहू लागले. पहिल्या दिवसापासून ही महिला आजारी होती. मुलगा सेंट्रींगचे काम करतो, मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो कधी घरी येतो तर कधी येतही नाही. शुक्रवारी रात्री मायाबाई यांंना घरीच रक्ताची उलटी झाली. त्या बेशुध्दावस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर घर मालकाने मुलाशी संपर्क केला, मात्र तेव्हा झाला नाही. त्यामुळे या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.याबाबत एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. हेडकॉन्स्टेबल दिनकर खैरनार यांनी जिल्हा रुग्णालयात जावून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. नातेवाईकांची चौकशी केली असता फारशी माहिती मिळाली नाही.  मृतदेह जिल्हा रुग्णालयात   त्यामुळे मृतदेह शवागार गृहात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आईचा मृत्यू झाल्याबाबत घर मालक व अन्य लोकांनी मुलाला फोनद्वारे कळविले, परंतु त्याने ऐकून घेतले, परंतु रात्रीतून किंवा दुसºया दिवशीही तो रुग्णालयात किंवा घरी आला नाही. नंतर मात्र त्याच्याशीही संपर्क झाला नाही. भुसावळ येथे खडका चौक परिसरात मायाबाई यांचे जवळचे नातेवाईक राहत असल्याची माहिती मिळाली आहे. घर मालक तेथे चौकशीसाठी गेल्याची माहिती खैरनार यांनी दिली.