शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अखेर ‘त्या’ २० वादग्रस्त गुरांचा ताबा गोशाळेकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव : येथील ‘त्या’ २० गुरांचा ताबा गोशाळेकडे देण्याबाबतचा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे. येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : येथील ‘त्या’ २० गुरांचा ताबा गोशाळेकडे देण्याबाबतचा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे.

येथे २० जुलै रोजी पोलिसांनी २० गुरे कुरेशी मोहल्ल्यातून जप्त केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीपाद पांडे यांनी दिनांक ३१ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावेळेस न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर आरोपींनी ही गुरे ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात कामधेनू गो सेवा मंडळ, धरणगाव यांनादेखील सामनेवाले करण्यात आले होते. त्यात गोशाळेच्या वतीने अध्यक्ष ह.भ.प. सी. एस. पाटील हे हजर झाले व त्यात गोशाळेच्या वतीने ॲड. राहुल एस. पारेख व ॲड. वसंतराव भोलाणे यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १७ ऑगस्ट रोजी आदेश केला की, अर्जदार यांची मालकी सिद्ध होत नाही. तसेच ही गुरे लहान वयाची असल्याने ती शेती उपयोगी नाहीत, त्यामुळे त्यांचा ताबा अर्जदार आरोपींकडे देता येणार नाही. त्यांचा ताबा कामधेनू गो सेवा मंडळ या गोशाळेकडेच कायम ठेवण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने पारित केला. या आदेशाने गोप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

न्यायालयाच्या अशा आदेशाने चुकीच्या गोष्टींना आळा बसेल. गावातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांपासून गावात चर्चेचा विषय होता. आजच्या आदेशाने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

-ॲड. राहुल पारेख