शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अखेर ‘त्या’ २० वादग्रस्त गुरांचा ताबा गोशाळेकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव : येथील ‘त्या’ २० गुरांचा ताबा गोशाळेकडे देण्याबाबतचा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे. येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : येथील ‘त्या’ २० गुरांचा ताबा गोशाळेकडे देण्याबाबतचा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे.

येथे २० जुलै रोजी पोलिसांनी २० गुरे कुरेशी मोहल्ल्यातून जप्त केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीपाद पांडे यांनी दिनांक ३१ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावेळेस न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर आरोपींनी ही गुरे ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात कामधेनू गो सेवा मंडळ, धरणगाव यांनादेखील सामनेवाले करण्यात आले होते. त्यात गोशाळेच्या वतीने अध्यक्ष ह.भ.प. सी. एस. पाटील हे हजर झाले व त्यात गोशाळेच्या वतीने ॲड. राहुल एस. पारेख व ॲड. वसंतराव भोलाणे यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १७ ऑगस्ट रोजी आदेश केला की, अर्जदार यांची मालकी सिद्ध होत नाही. तसेच ही गुरे लहान वयाची असल्याने ती शेती उपयोगी नाहीत, त्यामुळे त्यांचा ताबा अर्जदार आरोपींकडे देता येणार नाही. त्यांचा ताबा कामधेनू गो सेवा मंडळ या गोशाळेकडेच कायम ठेवण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने पारित केला. या आदेशाने गोप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

न्यायालयाच्या अशा आदेशाने चुकीच्या गोष्टींना आळा बसेल. गावातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांपासून गावात चर्चेचा विषय होता. आजच्या आदेशाने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

-ॲड. राहुल पारेख