शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

४२ कोटींच्या रद्द केलेल्या ठरावाविरोधात ॲड.हाडांची न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाकडून मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटींपैकी ४२ कोटींमधील कामे रद्द करून, नव्याने १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाकडून मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटींपैकी ४२ कोटींमधील कामे रद्द करून, नव्याने १०० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे करण्याचा मनपातील सत्ताधाऱ्यांच्या ठरावाविरोधात भाजप नगरसेविका तथा माजी स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच हा ठराव रद्द करून, ४२ कोटींमधील नियोजीत कामे करण्यात यावी अशी मागणी ॲड.हाडा यांनी केली आहे. याचिका दाखल झाल्यानंतर मनपाला याबाबतची नोटीस प्राप्त झाली असून, याबाबत पुढील कामकाज ३ ऑगस्टला होणार आहे.

दरम्यान, ॲड.शुचिता हाडा यांनी याकामांबाबत याचिका दाखल केल्यानंतर भाजप व शिवसेनेत विकासकामांमध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दोन्हीही पक्षांच्या नियोजनाअभावी व राजकारणामुळे जळगावकरांचे मात्र हाल कायम राहणार आहेत.

काय आहे प्रकरण

१. १६ ऑगस्ट २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्यानुसार तत्कालीन मनपातील सत्ताधाऱ्यांनी तब्बल आठ महिन्यांनंतर १०० पैकी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

२. त्यात शासनाने ५० कोटींच्या पहिल्या प्रस्तावातील ४२ कोटींच्या कामांना मंजुरी देत ८ कोटीतील इतर कामे नामंजूर केली होती. तर उर्वरीत ५८ कोटींचा प्रस्ताव नव्याने पाठविण्याच्या सूचना दिल्या.

३. ४२ कोटींच्या कामांची निविदा होवून याबाबत ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर राज्य शासनाने स्थगिती आणली होती. ती स्थगिती अद्याप कायम आहे.

४. मनपात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने ४२ कोटींमध्ये रस्त्यांची कामे असल्याने व शहरासाठी रस्त्यांची कामे प्राथमिक असल्याचे कारण देत ४२ कोटींची कामे रद्द करून, नवा प्रस्ताव पाठविण्याचा ठराव केला होता. या ठरावाला भाजपने विरोध करत, न्यायालयात याचिक दाखल केली आहे.

आमने - सामने

वाढीव दराने कामे दिल्यास मनपाला फटका - ॲड.शुचिता हाडा

- ४२ कोटी रूपयांमधील निधीच्या कामांना शासनाने स्थगिती दिली आहे. ही कामे शासनाने रद्द केलेली नाहीत. अशा परिस्थितीत मनपाने ही कामे रद्द करणे कायदेशीर नाही.

- जी कामे ४२ कोटींमध्ये घेण्यात आली आहेत. त्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा त्याच कामांसाठी निविदा काढली तर आजच्या डीएसआर रेटने ३ कोटींचा अतिरिक्त भुर्दंड मनपाला बसणार आहे, याबाबत कोण जबाबदार राहिल ?

- शहरातील रस्त्यांची कामे उर्वरीत ५८ कोटींच्या निधीमध्ये तरतूद करता येवू शकते. मात्र, ४२ कोटींच्या कामे रद्द करून शहरात सुरु होणारी कामे थांबणार आहेत. हा ठराव शहरातील विकासकामांमध्ये अडथळा आणणारा ठराव असल्याने जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

शहरातील प्रश्न सोडून दुसऱ्याची वकिली करण्याचा प्रयत्न - नितीन लढ्ढा

- भाजपने २५ कोटींच्या निधीमध्ये देखील खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. आता ही तेच काम होताना दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची कामे महत्वाची असताना, इतर कामांना भाजपने प्राधान्य दिले आहे.

- जळगावकरांसाठी रस्त्यांच्या कामाव्यतिरिक्त सध्यस्थिती इतर कोणतेही कामे महत्वाची नाहीत. त्यामुळे ४२ कोटींमधील कामे रद्द करून, सर्व १०० कोटींच्या निधीतून केवळ रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही ठराव केला आहे.

- तसेच कार्यादेश दिलेल्या ४२ पैकी १६ कोटीमधील रस्त्यांची कामे तशीच ठेवता येवू शकतात. मात्र, इतर अनावश्यक कामे की ज्या कामांची गरज सध्यातरी जळगावकरांना नाही अशी कामे थांबवून त्यात रस्त्यांचा समावेश करण्याची गरज आहे. भाजपकडून शहरातील प्रश्न सोडून दुसऱ्यांची वकिली करण्याचे काम सुरु असून, विकासकामे रोखण्याचा घाट सुरु आहे.