शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने प्रौढाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:04 IST

मृतदेह नेला पाळधी पोलिसात

जळगाव : आठ दिवसापूर्वी पोलिसांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे शेजारच्याने माझे काहीच झाले नाही, असे सांगत पुन्हा मारहाण केल्याने नैराश्यात आलेल्या संभाजी सुखदेव साळुंखे (४२) या प्रौढाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना धार, ता.धरणगाव येथे घडली. दरम्यान, संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पाळधी दूरक्षेत्रात नेला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाला आहे, असा आरोप करुन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी लगेच पाच जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. त्यानंतर सायंकाळी मृत संभाजी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास मंगा साळवे, सरलाबाई कैलास साळवे, शितल कैलास साळवे, पूजा कैलास साळवे व पूनम कैलास साळवे (सर्व रा.धार, ता.धरणगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून कैलास साळवे याला अटक करण्यात आली आहे.याबाबत मृत संभाजी साळुंखे यांची पत्नी उषाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जुलै रोजी शेजारी राहणारे सरला कैलास साळवे व त्यांच्या मुली शितल, पूजा व पूनम यांनी घराच्या पत्र्यावर माती पडल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत पाळधी पोलिसात तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन वैद्यकिय मेमो देऊन उपचारासाठी पाठविले. त्यानंतर देखील या कुटुंबाने सतत शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. याचीही माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.१ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पती संभाजी, मुलगा ज्ञानेश्वर व जयेश असे घरी असताना कैलास मंगा साळवे याने घरी येऊन शिवीगाळ केली व टोचून बोलला की, तु तक्रार केली, माझे काय झाले. तुझ्याकडून माझे काहीच होणार नाही. मी पोलिसांना पैसे दिले आहेत, असे म्हणत परत पती व मुलांना मारहाण केली. एकीकडे पोलिसांनी तक्रारीनंतरही कारवाई केली नाही दुसरीकडे शेजारच्याच त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यामुळे मनस्ताप करुन संभाजी याने रात्री नऊ वाजता घराच्या वरच्या मजल्यावर जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली. रात्री १० वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.पोलिसांच्या दुर्लक्षामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यांनी समोरासमोर दोघं गटाला बोलावून समजूत घातली असती तर ही घटना घडली नसती. पोलिसांनी यात पैसे घेतले आहेत.-उषाबाई साळुंखे, मृताची पत्नीया प्रकरणात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय १४९ ची नोटीस देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अदखलपात्र गुन्ह्याच पोलिसांना तपासाच्या मर्यादा असतात.-हनुमंत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक, पाळधी

टॅग्स :Jalgaonजळगाव