शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जिल्ह्यात वर्षभरात फक्त सहा बालकांना ‘दत्तक विधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या काळात मुलांच्या दत्तक प्रक्रियेलाही विलंब होत आहे. त्यातच जळगावला एजन्सी नाही. त्यामुळे मुले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या काळात मुलांच्या दत्तक प्रक्रियेलाही विलंब होत आहे. त्यातच जळगावला एजन्सी नाही. त्यामुळे मुले दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्यांना धुळे किंवा औरंगाबाद येथील एजन्सीच्या कार्यालयातून प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.

जळगाव जिल्ह्यातील पालकांना मुले दत्तक घ्यायची असतील, तर त्यासाठी इच्छुक दाम्पत्याला कारा या नोडल एजन्सीच्या वेबासाइटवर नोंदणी करावी लागते, तसेच त्याच्या जवळच्या कार्यालयात जाऊन त्याची अर्ज आणि योग्य त्या कागदपत्रांची प्रतही द्यावी लागते. त्यानंतर, त्यांना बालकाच्या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यानंतर, जिल्हा प्रशासन, महिला आणि बालकल्याण विभाग, न्यायालय आणि कारा यांच्या समन्वयातून त्या पालकांची योग्य ती चौकशी केली जाते. त्यांचे वय, उत्पन्न, तसेच त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता यांचाही विचार केला जातो. त्यावर आधारित एक अहवाल महिला आणि बालकल्याण विभागाकडून दिला जातो. त्यानंतरच त्या बालकांच्या दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू होते.

एखादे मूल आईनेच आपण सांभाळण्यास असमर्थ आहोत हे सांगितल्यानंतर, त्याची गुप्तपणे चौकशी केली जाते आणि योग्य असेल, तर ते मूल धुळे येथे पाठविले जाते. त्यानंतर, ते मूल योग्य त्या कार्यवाहीनंतर दत्तक घेऊ शकते, तसेच जे मूल बेवारस सापडते, त्यासाठी दोन महिने वाट पाहिली जाते. त्या मुलाच्या पालकांचा शोध घेतला जातो. त्यानंतरही दोन महिन्यांत त्या मुलाचे जैविक पालकांनी संपर्क न साधल्यास, ते मूल दत्तक जाण्यासाठी कार्यवाही केली जाते.

जळगावला एजन्सीचे कार्यालयच नाही

देशभरात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया ही कारा (सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी)च्या माध्यमातून केली जाते. त्याचे जळगावला कार्यालय सध्या नाही. या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. याचे कार्यालय जळगाव जिल्ह्यात सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यात मनुष्यबळाची अडचण आहे.

रक्ताच्या नात्यात दत्तक विधान सोपे

रक्ताच्या नात्यात दत्तक घेण्याची प्रक्रिया ही दोन महिन्यांतच पूर्ण केली जाते. मात्र, त्या व्यतिरिक्त मुले दत्तक घेण्याची प्रक्रियेला वेळ लागतो. त्यासाठी योग्य त्या एजन्सीकडे जावे लागते, तसेच त्या पालकांची चौकशीही होते.

कोट -

मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या एजन्सीचे कार्यालय सध्या जळगावला नाही. त्यामुळे पालकांना धुळे किंवा औरंगाबाद येथे संपर्क साधावा लागत आहे. आता लवकरच जळगावला स्वातंत्र्य चौकात हे कार्यालय सुरू होईल. त्यासाठी सध्या मनुष्यबळाची अडचण आहे.

आकडेवारी

२०२० मध्ये दत्तक घेतली गेलेली बालके ६