शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लॉकडाऊन संपताच मिळणार प्रवेशाबाबत सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्‍या कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्‍या कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. परिणामी, आरटीईअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी पडताळणी समितीकडे जाऊ नये. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर आवश्यक सूचना केल्या जातील, असे शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्‍यात आले आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी प्रवेश दिला जात असतो. यंदा जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. नुकतीच पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्‍यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर प्रतीक्षा यादीमध्‍ये सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, सध्या राज्यभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, या काळापर्यंत आरटीईची प्रक्रियासुद्धा थांबविण्‍यात आली आहे. या कालावधीत पालकांनी पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणीसाठी गर्दी करू नये व लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना करण्‍यात येतील, असे स्पष्ट आदेश पालकांना केले आहेत.

मुदतीत कागदपत्रांची तपासणी करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया थांबविण्‍यात आली असली, तरी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध होताच पालकांना कागदपत्रांची तपासणी करावयाची आहे. दरम्यान, पालकांना एसएमएस पाठविण्‍यात आले आहेत. मात्र, पालकांनी केवळ एसएमएस संदेशावरच अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक तपासून पाहावा, त्यावर प्रवेश घेण्याची तारीख दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.