शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

लॉकडाऊन संपताच मिळणार प्रवेशाबाबत सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्‍या कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्‍या कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. परिणामी, आरटीईअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी पडताळणी समितीकडे जाऊ नये. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर आवश्यक सूचना केल्या जातील, असे शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्‍यात आले आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी प्रवेश दिला जात असतो. यंदा जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. नुकतीच पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्‍यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर प्रतीक्षा यादीमध्‍ये सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, सध्या राज्यभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, या काळापर्यंत आरटीईची प्रक्रियासुद्धा थांबविण्‍यात आली आहे. या कालावधीत पालकांनी पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणीसाठी गर्दी करू नये व लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना करण्‍यात येतील, असे स्पष्ट आदेश पालकांना केले आहेत.

मुदतीत कागदपत्रांची तपासणी करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया थांबविण्‍यात आली असली, तरी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध होताच पालकांना कागदपत्रांची तपासणी करावयाची आहे. दरम्यान, पालकांना एसएमएस पाठविण्‍यात आले आहेत. मात्र, पालकांनी केवळ एसएमएस संदेशावरच अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक तपासून पाहावा, त्यावर प्रवेश घेण्याची तारीख दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.