शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्रगतीपुस्तकावरील वर्गोन्नत उल्लेखाने मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशाच बऱ्याच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नाही. परिणामी, राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने घेतला. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख असणार आहे.

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. संपूर्ण शैक्षणिक वर्ष उलटले, पण इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा उघडल्या नाहीत. इतर वर्गांना सुरुवात झाली. मात्र, तेही एक ते दीड महिना. त्यानंतर पुन्हा कोरोनाची लाट आल्यामुळे शाळा बंद झाल्या. परिणामी, वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्‍याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वर्गोन्नतचा उल्लेख असणार आहे.

विद्यार्थिसंख्या-

इयत्ता पहिली

मुले : ४०,६३४

मुली : ३५,८८०

=========

इयत्ता दुसरी

मुले : ४२,३६६

मुली : ३६,९४७

=========

- इयत्ता तिसरी

मुले : ४२,७५४

मुली : ३५,१६४

=========

- इयत्ता चौथी

मुले : ४३,७६७

मुली : ३६,२८३

=========

प्रगतीपुस्तक बदलणार

प्रगतीपुस्तकावरसुद्धा बदल झालेले पालकांना पाहायला मिळणार आहे. वर्षभर विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्यामुळे उपस्थिती, दिवस, उंची, वजन, तसेच श्रेणी आदी उल्लेख प्रगतीपुस्तकावर नसणार. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, त्यांच्या प्रगतीपुस्तकावरसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कुठल्या पद्धतीने उत्तीर्ण केले त्याचा उल्लेख असेल.

=========

- विद्यार्थी प्रतिक्रिया

मध्यंतरी शाळा उघडल्या होत्या. पहिली ते चौथीच्या वर्गांनासुद्धा लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या. घरात अभ्यास कमी होतो.

- अक्षय माळी, विद्यार्थी

========

स्वाध्याय उपक्रम छान आहे. नियमित त्या उपक्रमात सहभाग नोंदवितो; पण मागील आठवड्यात प्रश्न उपलब्ध झाले नाहीत. आता घरात बसूनसुद्धा कंटाळा आलाय. संसर्गाचे प्रमाण कमी होताच शाळा सुरू करण्‍यात याव्यात.

- संदीप पाटील, विद्यार्थी

=======

आता शाळांना सुट्या जाहीर झाल्या आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रम घ्यावेत. वर्षभर शाळा बंद असल्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला आहे.

- हर्षल सोनवणे, विद्यार्थी