शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मुर्दापूर धरण उंची वाढीबाबत प्रशासनाची उदासीनता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

नशिराबाद : मुर्दापूर धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, अवघे ५ टक्के काम उंची वाढीसाठी लागणारे ...

नशिराबाद : मुर्दापूर धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, अवघे ५ टक्के काम उंची वाढीसाठी लागणारे अतिरिक्त भूसंपादन न झाल्याने रखडले आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून ही प्रक्रिया सुरूच असून, उंची वाढीच्या कामात तापी पाटबंधारे विकास महामंडळ व प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नेमकं कामाचं घोडं अडलं कुठं, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. करोडोंचा खर्च वाया जात असून, अनेकदा ओरड होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या वर्षी हे धरण शंभर टक्के भरून ओसंडून वाहत होते. यातील लाखो लिटर पाणी वाहून गेले. हे पाणी असे वाया गेल्याने उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. मुर्दापूर तलाव १९९७ मध्ये बांधण्यात आला. धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असून, धरणावर नशिराबादची पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, शेतीसाठीही याचा चांगला लाभ होतो. मात्र, उंची वाढ नसल्याने धरण दोन वर्षांपासून भरून वाहत आहे.

मंत्रालयात फाईल पडून

२००२-०३ धरणाच्या उंची वाढीस मंजुरी मिळाली. २००८-०९ पर्यंत यासाठी निधीच न मिळाल्याने हे काम सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर २०१० मध्ये वेगवर्धित सिंचन योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने या कामास सुरुवात झाली. त्यामुळे या धरणाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५ टक्के कामही पूर्ण झाल्यास पाणीसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांना लाभ मिळणार आहे. उंची वाढीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाचे काम प्रलंबित असल्याने धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे २५ टक्के काम बाकी आहे. याविषयी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले की, उंची वाढीमुळे आवश्यक भूसंपादनासाठी २०१५ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र बंदिस्त पाइपलाइनचा विषय पुढे आल्याने व नवीन भूसंपादन कायदा २०१४ मुळे परिसरातील जमिनीचे मूल्य वाढल्याने २०१७-१८ च्या दर सूचीनुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन ते मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आले. मात्र, बंदिस्त पाइपलाइनचे अंदाजपत्रक सादर करा, असा शेरा मारला. त्याबाबतचे पत्र सप्टेंबर २०१८ ला आले. त्यानंतरही जून २०१९ पर्यंत ही फाईल तापी महामंडळातच धूळ खात होती. त्यानंतर पुन्हा त्यातील सर्व त्रुटी दूर करून ही फाईल नाशिकला संबंधित विभागाकडे गेली. एसएलटीसी समितीने सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन मुंबईला मंत्रालयात रवाना करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली असल्याचे लालचंद पाटील यांनी सांगितले.

यास जबाबदार कोण?

२००९ पासून उंची वाढीचे काम रखडत आहे. धरणासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, धरण अद्याप अपूर्णावस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. अवघ्या पाच टक्के कामासाठी इतकी वर्षे दुर्लक्ष करण्यामागील कारण काय, या जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

यंदाही पाणी वाहून जाणार?

पावसामुळे धरण गत दोन वर्षांपासून तुडुंब भरून वाहत आहे. त्यात उंची वाढीचा प्रश्न रखडल्याने दरवर्षी लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. मात्र, अनेकदा ओरड होऊनही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करीत असल्याची स्थिती आहे. उंची वाढीचा मुहूर्त गवसणार कधी याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. मात्र, यंदा पावसाळ्यात धरण भरल्यास पाणी पुन्हा वाहून जाणार, अशीच सध्या स्थिती आहे.