शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात आपत्तीची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये याकरीता प्रशासन उपाययोजना राबवित असून भविष्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात आपत्तीची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये याकरीता प्रशासन उपाययोजना राबवित असून भविष्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेचे सर्व उपाय तयार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून विविध यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्यावत करण्यात येऊन २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

धरणांची सुरक्षितता, पुररेषांची तपासणी

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर धरणांची सुरक्षितता, पुररेषा, धोक्याच्या पातळीतील वस्त्या यांची तपासणी करण्यात येण्यासोबतच जिल्ह्यातील पुलांची सुरक्षितता, धोकादायक पूल, शोध व बचावकार्य, साहित्याची सुस्थिती इत्यादी बाबींची खात्री करण्यात येत आहे.

अन्नधान्य व औषधांचा साठ्याचे नियोजन

पावसाळ्यात कोविड सेंटरच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारणे, वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरळीत राहील, आदिवासी भागात अन्नधान्याचा व औषधांचा साठा करुन ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा कार्यान्वित

गेल्यावर्षी पावसाळ्यात नदीपात्रात दोन महिला वाहून गेल्याने जिल्हा प्रशासनाने नाविण्यपूर्ण योजनेतून तापी नदीकाठच्या गावात बहुउद्देशीय आपत्कालीन डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रण कक्षात स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांना महत्वाची सूचना व माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हतनूर धरणाखाली तापी नदीकाठच्या भुसवाळ, यावल, जळगाव व रावेर तालुक्यातील नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण २५ गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यापूवी ३० मिनिटे अगोदर या २५ गावांना डिजिटल दवंडी सायरनद्वारे धोक्याची सूचना देऊन सतर्क करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक सावध होऊन वित्त व जीवीत हानी टाळता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.