शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग वाढल्याने प्रशासन उत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:22 IST

जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, आयुक्तांनी निर्माण केला विश्वास, चोपडा, अमळनेरातून लोकसहभागाची सुरुवात, कोरोना युध्दात सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे योगदान

मिलिंद कुलकर्णीकोरोनाविरुध्द लढायचे असेल तर प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी व सामाजिक संस्था यांनी सामूहिक प्रयत्न केले तरच ते शक्य आहे, या निष्कर्षाप्रत आता सगळे आले आहेत. या तिन्ही घटकांपैकी एकट्याने हडेलहप्पीने निर्णय घेतल्यास परिणाम वेगळेच येतील. हे महासंकट आहे, त्याच्याशी मुकाबला करायचा असेल तर अहंकार, मानापमान या गोष्टी बाजूला ठेवून काम करावे लागेल. दुर्देवाने जळगाव जिल्ह्यात सुरुवातीपासून असे घडले नाही. प्रत्येक घटक हा स्वतंत्र व सार्वभौम असल्याच्या तोऱ्यात होता. याचा परिणाम जळगावच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचे देशभर वाभाडे निघण्यात झाला. हे केवळ आरोग्य सेवेचे म्हणजे प्रशासनाचे वाभाडे नव्हते, तर ही यंत्रणा राबविणाºया लोकप्रतिनिधींचे आणि अशा लोकप्रतिनिधींनी निवडून देण्यासाठी समाजाची भूमिका तयार करण्यात मोठे योगदान देणाºया स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे होते.नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद आणि महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी समन्वयाने काम करीत पंधरवड्यात स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचे परिणाम चांगले दिसू लागले आहेत. चोपड्यात लोकसहभागाने आॅक्सीजनसह खाटांची व्यवस्था तयार झाली. अमळनेरात डॉक्टरांनी एकत्र येत रुग्ण तपासणीमध्ये सहकार्य केले. जळगावात रुग्ण तपासणी अभियानात सामाजिक व स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या. हे सुचिन्ह म्हणावे लागेल.राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे चांगले काम करीत आहे. स्वत: दौरे करुन रुग्णालयांची पाहणी करीत आहेत. महिनाभरापूर्वी त्यांनी आणि पंधरवड्यापूर्वी केंद्रीय समितीचे अधिकारी डॉ.ए.जी.अलोने यांनी केलेल्या सुचनांवर प्रशासनाने कठोरपणे अंमल करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन हा १३ जुलैनंतर राहणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पुणे आणि ठाण्याच्या निर्णयानंतर मुदतवाढीविषयी विचार होऊ नये. त्यापेक्षा प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंध कडक करायला हवे. झोपडपट्टी, दाटवस्तीवर लक्ष केंद्रित करायला हवे. संशयित रुग्ण तपासणी अभियानात आढळून आलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींवर उपचार व्हावे, कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांवर खाजगी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णांलयांमध्ये उपचार व्हावे, पुरेशा खाटा, रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, याची काळजी घ्यावी. २४ तासात अहवाल येतील, याची खबरदारी घ्यावी. रुग्णालयांमधील रिक्त पदे भरण्यात कमी पगाराचा मुद्दा पुढे येत आहे, पगाराची मर्यादा वाढविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्यास ते सहकार्य करायला तयार होतील. त्यासोबतच भ्रष्टाचार, गैरव्यवहार, काळाबाजार आणि स्वार्थासाठी चालढकल करणाºया अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर राष्टÑीय आपत्ती कायद्यानुसार कारवाईचे कठोर पाऊलदेखील उचलावे, म्हणजे अस्तनीतले निखारे समोर येतील. प्रशासनाच्या सकारात्मकतेने लोकसहभाग वाढला आहे, तो उत्तरोत्तर वाढेल आणि दु:खाचे ढग हळूहळू कमी होतील, असा विश्वास आहे.देशाच्या मृत्यूदरापेक्षा चौपट मृत्यूदर, कोविड रुग्णालयातील बेपत्ता रुग्णाचा आठवड्याने स्वच्छतागृहात सापडलेला मृतदेह, रुग्णांचे बेपत्ता होणे, वेळेवर उपचार न होणे ही सगळी नकारात्मकता असताना सकारात्मकतेने काम सुरु झाले.आरोग्यमंत्री, केंद्रीय समितीचे अधिकारीयांनी प्रत्यक्ष भेटीतून दिलेल्या सुचनांवर अंमलबजावणी, लोकसहभाग घेऊन वास्तव स्थिती समजून घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील कोरोना महामारीची स्थिती हळूहळू सुधारत आहे. मृत्यूदर १२ वरुन ६.५ टक्कयांवर आला आहे. बरे होणाºया रुग्णांची सरासरी ६० टक्कयांहून अधिक आहे. स्वयंसेवी संस्था स्वत:हून पुढे येत आहे, त्यामुळे प्रशासनात उत्साह जाणवत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव