शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

थेट शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा करा

By admin | Updated: April 17, 2017 00:25 IST

राधाकृष्ण विखे पाटील : नारायण राणे यांनी अडचणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करायला हवे

चंद्रकांत जाधव, जळगावकर्जमाफी दिली, पण तिचा लाभ शेतकºयांना न होता राज्यातील सहकारी बँकांना झाला असे सांगून शेतकºयांना मदतच न करण्याचा वेळकाढूपणा सरकार करीत आहे. पण सरकारला राज्यातील सहकारी बँकांबाबत आक्षेप असेल तर शेतकºयांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करा. कर्जमाफीऐवजी ही थेट मदत शेतकºयांना मोलाची ठरेल, असे मत राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी व्यक्त केले. विरोधकांतर्फे आयोजित शेतकरी संघर्ष यात्रा जिल्ह्यात आली असता ‘लोकमत’ने विखेपाटील यांच्याशी संवाद साधला... त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरुपात असा़

प्रश्न - उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे दर मिळत नाहीत. स्वामिनाथन आयोगाचा मुद्दाही मागे पडला. याविषयी काय सांगाल?विखे पाटील - लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर आधारित दरांचा मुद्दा मांडला. नंतर राज्य सरकारमधील मंडळीनेही निवडणुकीच्या प्रचारात हाच मुद्दा घेतला. पण केंद्रात तीन वर्षे झाली व राज्यात सव्वादोन वर्षे झाली, अजून उत्पादन खर्चावर आधारित दर शेतमालास नाहीत. आमच्या सरकारने १४० टक्के हमीभाव वाढविले. कृषी मूल्य आयोगाला शेतमाल दरवाढीच्या शिफारसी सरकार करीत नाही. कोरडवाहू शेतकºयांचे ८० टक्के उत्पन्न घटले. तूर खरेदी केंद्रांवर बारदानचा प्रश्न पुढे आले. व्यापाºयांनी शेतकºयांची मोठी लूट केली. हे नकारात्मक सरकार आहे. प्रश्न - नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या, त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या उठत आहेत, यावर काय सांगाल?विखे पाटील - नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. ज्या बातम्या येतात त्यावर राणे यांनी खुलासा केला. पण अडचणीच्या काळात राणे यांनी काँग्रेसचे नेतृत्व करायला हवे. प्रश्न - संघर्ष यात्रेला कसा प्रतिसाद मिळाला. संघर्ष यात्रेनंतरही कर्जमाफी झाली नाही तर पुढे काय भूमिका असेल?विखे पाटील - शेतकरी संघर्ष यात्रेतून कर्जमाफी व इतर मुद्द्यांबाबत आम्ही मोठी जागरूकता निर्माण करू शकलो. अनेक जण यात जुळले. अधिवेशनात सतत १० दिवस हा मुद्दा आम्ही मांडला. सरकार अल्पमतात आले असते म्हणून सरकारने १९ आमदार निलंबित केले. कारण शिवसेनाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमच्यासोबत होती. पण आमदारांचे निलंबन केले... म्हणून आम्ही कर्जमाफीची मागणी करून गुन्हा केला का? पण या यात्रेमुळे सरकारवर दबाव वाढला. मुख्यमंत्री शेतकºयांशी संवाद साधू लागले आहे. सरकारने बँकांकडून लाखभर कर्जाची माहिती मागविली आहे. प्रश्न - संयुक्त पुरोगामी सरकारच्या २००८ च्या कर्जमाफीनंतरही आत्महत्या झाल्या. आता कर्जमाफी केली तर पुढे आत्महत्या होणार नाहीत याची शाश्वती देता येईल का?विखे पाटील - संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीनंतर आत्महत्यांचे प्रमाण ८० टक्के घटले. शेतकºयांना                        त्या कर्जमाफीचा लाभ झाला. पण मध्यंतरी तीन वर्षे दुष्काळ पडला... शेतमालाबाबात फारसे दर नव्हते. यामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या. कर्जमाफी आम्हीही नेहमी                मागत नाहीत. सरसकट कर्जमाफी करायला हवी.

 

खडसेंनी आग्रह केल्याने चहा घ्यायला गेलो...राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, एकनाथराव खडसे व आम्ही अनेक वर्षे सोबत सभागृहामध्ये आहोत. त्यांच्याशी जी भेट मुक्ताईनगरात झाली ती औपचारिक होती. आम्ही मुक्ताईनगरात येणार होतो. खडसे यांनी चहा घ्यायला या.., असा आग्रह केला होता. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. पण भेट राजकीय स्वरुपाची नव्हती. राजकारणाच्या जागी राजकारण व मैत्रीच्या जागी मैत्री आहे. उत्तर प्रदेशात कर्जमाफी शेतकºयांना झाली.                             राज्यात नेमक्या काय अडचणी आहेत?विखे पाटील म्हणाले, मूळाचत या सरकारची इच्छाशक्ती नाही. शेतकरी हा सरकारच्या अजेंड्यावर नाही. दुष्काळाचा फटका बसला. नंतर जलयुक्त शिवार योजना सरकारने आणली, पण आमच्या सरकारच्या काळात आम्ही महात्मा फुले यांच्या नावाने ही योजना चालवित होतो. फक्त नाव बदलून जलयुक्त शिवाय योजना आणली. जलयुक्त शिवाय योजनेत त्रुटी आहेत.             ८० टक्के क्षेत्र राज्यात कोरडवाहू आहे. त्या दृष्टीने धोरण हवे.