शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही नागरिकाने तक्रार दिली असेल, तर पोलिसांनी ती विनाविलंब नोंदवून घेणे अपेक्षित आहे. तक्रार खोटी असेल, ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही नागरिकाने तक्रार दिली असेल, तर पोलिसांनी ती विनाविलंब नोंदवून घेणे अपेक्षित आहे. तक्रार खोटी असेल, तर ती तपासात निकाली काढण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र, तक्रारच दाखल करून न घेणे चुकीचे आहे. त्याशिवाय सीआरपीसी १५४ प्रमाणे हद्दीचा वाद न घालता शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे, तसे झाले नाही, तर प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदाराविरुद्ध विभागीय कारवाई होऊ शकते.

कोट..

घटना कुठेही घडलेली असली तरी शून्य क्रमांकाने दाखल करून तो गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. हद्दीच्या वादामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे प्रकार अलीकडच्या काळात जिल्ह्यात अजून तरी घडलेले नाहीत. तसा प्रकार घडला तर प्रभारी अधिकाऱ्यालाच जबाबदार धरून कारवाई केली जाईल.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

गुन्हा दाखल न करण्याचे हे आहे उदाहरण

जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटर गैरव्यवहार प्रकरणात दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारदार दिनेश भोळे मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी फिर्यादही नेलेली होती. मात्र, प्रभारी अधिकारी नसल्याचे सांगून दुय्यम अधिकारी व ठाणे अंमलदारांनी तक्रारच घेतली नाही. त्यामुळे भोळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व्हावेत यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी असे घडले होते हद्दीचे विषय

१) आंतरजातीय विवाह केलेल्या प्रेमीयुगुलाच्या प्रकरणातील पीडिता नशिराबादला वास्तव्याला असल्याने त्या तेथे तक्रार द्यायला गेल्या होत्या. मात्र, घटनास्थळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे हद्दीचा वाद निर्माण करून तक्रार घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

२) शिरसोली रस्त्यावरील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयापासून शहरात येत असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षा चालकाने डी मार्टजवळ उतरवून त्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळील पाचशे रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्याने पोलिसांकडे धाव घेतली असता त्याला टोलवाटोलव करण्यात आली. या घटनेनंतर मोहित याने इच्छा देवी चौकीत जाऊन एका पोलिसाला सांगितले. त्या पोलिसाने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर हा तरुण दीड तास थांबला, घटनास्थळ रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगून तेथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने पुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथेही दीड तास थांबवून ठेवत ठाणे अमलदाराने आज नको, उद्या ये, असे सांगून हाकलून लावले होते.