शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही नागरिकाने तक्रार दिली असेल, तर पोलिसांनी ती विनाविलंब नोंदवून घेणे अपेक्षित आहे. तक्रार खोटी असेल, ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही नागरिकाने तक्रार दिली असेल, तर पोलिसांनी ती विनाविलंब नोंदवून घेणे अपेक्षित आहे. तक्रार खोटी असेल, तर ती तपासात निकाली काढण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र, तक्रारच दाखल करून न घेणे चुकीचे आहे. त्याशिवाय सीआरपीसी १५४ प्रमाणे हद्दीचा वाद न घालता शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे, तसे झाले नाही, तर प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदाराविरुद्ध विभागीय कारवाई होऊ शकते.

कोट..

घटना कुठेही घडलेली असली तरी शून्य क्रमांकाने दाखल करून तो गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. हद्दीच्या वादामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे प्रकार अलीकडच्या काळात जिल्ह्यात अजून तरी घडलेले नाहीत. तसा प्रकार घडला तर प्रभारी अधिकाऱ्यालाच जबाबदार धरून कारवाई केली जाईल.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

गुन्हा दाखल न करण्याचे हे आहे उदाहरण

जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटर गैरव्यवहार प्रकरणात दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारदार दिनेश भोळे मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी फिर्यादही नेलेली होती. मात्र, प्रभारी अधिकारी नसल्याचे सांगून दुय्यम अधिकारी व ठाणे अंमलदारांनी तक्रारच घेतली नाही. त्यामुळे भोळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व्हावेत यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी असे घडले होते हद्दीचे विषय

१) आंतरजातीय विवाह केलेल्या प्रेमीयुगुलाच्या प्रकरणातील पीडिता नशिराबादला वास्तव्याला असल्याने त्या तेथे तक्रार द्यायला गेल्या होत्या. मात्र, घटनास्थळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे हद्दीचा वाद निर्माण करून तक्रार घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

२) शिरसोली रस्त्यावरील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयापासून शहरात येत असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षा चालकाने डी मार्टजवळ उतरवून त्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळील पाचशे रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्याने पोलिसांकडे धाव घेतली असता त्याला टोलवाटोलव करण्यात आली. या घटनेनंतर मोहित याने इच्छा देवी चौकीत जाऊन एका पोलिसाला सांगितले. त्या पोलिसाने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर हा तरुण दीड तास थांबला, घटनास्थळ रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगून तेथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने पुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथेही दीड तास थांबवून ठेवत ठाणे अमलदाराने आज नको, उद्या ये, असे सांगून हाकलून लावले होते.