शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृती समिती धसास लावणार महामार्गाचा प्रश्न

By admin | Updated: February 5, 2017 00:45 IST

ेएक नागरिक मंचच्या सभेत निर्धार : लोकप्रतिनिधी व संवेदनाहीन प्रशासनावर सडकून टीका

जळगाव :  राष्ट्रीय महामार्गाची झालेली दैना, चौपदरीकरण व समांतर रस्त्यांचे भिजत घोंगडे या गंभीर प्रश्नांबाबत पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविण्यासाठी अराजकीय कृती समिती स्थापन केली जाईल. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेल, नंतर साखळी उपोषण केले जाईल.., ही आंदोलने करीत असतानाच राज्य शासन, प्रशासन, केंद्रीय सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी एक नागरिक मंचतर्फे आयोजित जाहीर सभेत घेण्यात आला. या सभेत खासदार, आमदार व संवेदनाहीन प्रशासनावर सडकून टीका झाली. शहरातील जयप्रकाश नारायण चौकात ही जाहीर सभा झाली. त्यात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डी.डी.बच्छाव, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.प्रताप जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक अनंत जोशी, स्वाती अहिरराव, नगरसेविका अश्विनी देशमुख, अॅड.शुचिता हाडा,  जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे फारूख शेख, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी नगरसेवक मनोज चौधरी, पीयुष नरेंद्र पाटील, सरिता माळी, बंटी नेरपगार यांनी आपापली भूमिका मांडली. मान्यवरांशिवाय व्यासपीठसभेसाठी व्यासपीठ उभारले होते, पण त्यावर एक नागरिक मंचशी संबंधित कुठलीही व्यक्ती बसली नाही. मान्यवर खाली बसले होते. आपली भूमिका मांडण्यासाठी ते व्यासपीठावर येत होते.जसे मेहरूण तलावाच्या कामाला प्राधान्य दिले तसे प्राधान्य समांतर रस्त्याला  द्यावे. मनपाचे कर्मचारी भाजीबाजारातील अतिक्रमण लागलीच काढतात. याच गतीने महामार्गावरील अतिक्रमणेही काढावीत, अशीही अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.    सर्व पर्याय संपल्यावर               महामार्गावर 12 तास आंदोलनसाखळी उपोषण, मोर्चे, पदयात्रा, निवेदन देणे, पाठपुरावा हे सर्वच मार्ग अयशस्वी झाले किंवा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी त्याची दखल घेतली नाही तर  तरूण, महिला अशा सर्वानी एकत्र येऊन महामार्ग 12 तास बंद पाडावा, अशी भूमिका मुकुंद सपकाळे, अनंत जोशी यांनी मांडली. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र यावेसभेत मान्यवरांनी आपली भूमिका मांडताना महामार्ग प्रश्नी अराजकीय मंच म्हणून कृती समिती स्थापन करण्याचा मुद्दा मांडला. त्यावर सर्वानीच सकारात्मक भूमिका घेतली. समांतर रस्ते, महामार्ग हा यक्ष प्रश्न असून, तो सोडविण्यासाठी आंदोलनांची जशी गरज आहे, तसा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करण्याची देखील गरज आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलने शांततामय मार्गाने करीत असतानाच लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडेही तेवढय़ाच गतीने, व्यवस्थितपणे पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र यावे, असा मुद्दाही मांडण्यात आला. त्यावर सर्वानी सहमती दिली. अजिंठा चौक विकासाचा प्रस्ताव धूळखात-प्रा.डी.डी. बच्छावअजिंठा चौकातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता दोन हॉटेल व आपण मिळून महापालिकेला अजिंठा चौक विकासाचा प्रस्ताव सादर केला, पण तो कुठे पडून आहे, मार्गी का लागत नाही, असा प्रश्न प्रा.डी.डी.बच्छाव यांनी उपस्थित केला.