शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

वर्षभरात मास्क न लावणाऱ्या दहा हजार जणांवर कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट ...

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन होते. विनापरवानगी बाहेर फिरायलाही तेव्हा बंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर प्रशासनाने कलम १८८, जमावबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याअंतर्गत जागेवर दोनशे रुपयांचाही दंड आकारण्यात आला होता. दुकानदारांवर कारवाया करून त्यांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली होती. विनापास प्रवास करणाऱ्या लोकांवर तसेच वाहनांवरही कारवाया करण्यात आल्या. परवानी नसताना अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक होते. ९ हजार ८३६ जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्याशिवाय पास नसतानाही एका तालुक्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या १ हजार १६२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती.

कोरोना नियंत्रणासाठीच्या कारवाया

दाखल गुन्हे -१४६३०

विनामास्क कारवाई -९८३६

ट्रिपल सीट -४२२

मंगल कार्यालय, हॉल -२८

२०२१ मध्ये तीन हजार जणांना दंड

जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून कडक नियम लागू झाला. विनामास्क फिरणाऱ्या ३ हजार ७७६ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमविणाऱ्या ११७ जणांवर कारवाई झाली आहे, त्यांच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. मंगल कार्यालय मालकांकडूनही ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय १८८ अन्वये २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोट....

कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. गस्त, दैनंदिन कामे व गुन्ह्यांचा तपासामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आहे, त्यात कोरोनाशी लढावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांकडून कलम १८८ अन्वये कारवाई केली जाते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझी जबाबदारी समजून शासन नियमांचे पालन करून स्वत:च आणि कुटुंबाचा बचाव करावा.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक