शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

वर्षभरात मास्क न लावणाऱ्या दहा हजार जणांवर कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट ...

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन होते. विनापरवानगी बाहेर फिरायलाही तेव्हा बंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर प्रशासनाने कलम १८८, जमावबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याअंतर्गत जागेवर दोनशे रुपयांचाही दंड आकारण्यात आला होता. दुकानदारांवर कारवाया करून त्यांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली होती. विनापास प्रवास करणाऱ्या लोकांवर तसेच वाहनांवरही कारवाया करण्यात आल्या. परवानी नसताना अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक होते. ९ हजार ८३६ जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्याशिवाय पास नसतानाही एका तालुक्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या १ हजार १६२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती.

कोरोना नियंत्रणासाठीच्या कारवाया

दाखल गुन्हे -१४६३०

विनामास्क कारवाई -९८३६

ट्रिपल सीट -४२२

मंगल कार्यालय, हॉल -२८

२०२१ मध्ये तीन हजार जणांना दंड

जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून कडक नियम लागू झाला. विनामास्क फिरणाऱ्या ३ हजार ७७६ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमविणाऱ्या ११७ जणांवर कारवाई झाली आहे, त्यांच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. मंगल कार्यालय मालकांकडूनही ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय १८८ अन्वये २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोट....

कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. गस्त, दैनंदिन कामे व गुन्ह्यांचा तपासामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आहे, त्यात कोरोनाशी लढावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांकडून कलम १८८ अन्वये कारवाई केली जाते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझी जबाबदारी समजून शासन नियमांचे पालन करून स्वत:च आणि कुटुंबाचा बचाव करावा.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक