शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मास्क न लावणाऱ्या दहा हजार जणांवर कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट ...

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन होते. विनापरवानगी बाहेर फिरायलाही तेव्हा बंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर प्रशासनाने कलम १८८, जमावबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याअंतर्गत जागेवर दोनशे रुपयांचाही दंड आकारण्यात आला होता. दुकानदारांवर कारवाया करून त्यांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली होती. विनापास प्रवास करणाऱ्या लोकांवर तसेच वाहनांवरही कारवाया करण्यात आल्या. परवानी नसताना अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक होते. ९ हजार ८३६ जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्याशिवाय पास नसतानाही एका तालुक्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या १ हजार १६२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती.

कोरोना नियंत्रणासाठीच्या कारवाया

दाखल गुन्हे -१४६३०

विनामास्क कारवाई -९८३६

ट्रिपल सीट -४२२

मंगल कार्यालय, हॉल -२८

२०२१ मध्ये तीन हजार जणांना दंड

जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून कडक नियम लागू झाला. विनामास्क फिरणाऱ्या ३ हजार ७७६ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमविणाऱ्या ११७ जणांवर कारवाई झाली आहे, त्यांच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. मंगल कार्यालय मालकांकडूनही ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय १८८ अन्वये २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोट....

कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. गस्त, दैनंदिन कामे व गुन्ह्यांचा तपासामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आहे, त्यात कोरोनाशी लढावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांकडून कलम १८८ अन्वये कारवाई केली जाते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझी जबाबदारी समजून शासन नियमांचे पालन करून स्वत:च आणि कुटुंबाचा बचाव करावा.

-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक