शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

बेजबाबदार व्यवस्थापनामुळे शिक्षकाचा बळी गेल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:17 IST

निवडणूक प्रशिक्षणात सुविधांचा अभाव

अमळनेर : निवडणूक प्रशिक्षण काळातील शिक्षकाचा गेलेला बळी हा बेजबाबदार व्यवस्थापनामुळे गेल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. उन्हाच्या तीव्रतेचा व मानवी शरीराचा विचार न करता निव्वळ सरकारी काम पार पाडण्याच्या वृत्तीमुळे हा प्रकार घडल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहेभर उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक होत असून मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र निवडणूक पारदर्शी करण्यासाठी फक्त शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांचे तालुके बदलवून त्यांना दुसऱ्या तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमले गेले आहे. मात्र एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात प्रशिक्षण व्यवस्था भिन्न असल्याचे कर्मचाऱ्यांच्या अनुभवास आले असून बेजबाबदार व्यवस्थेमुळेच कळमसºयाचे शिक्षक अंबादास चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे.चाळीसगाव येथे शिक्षकांचे प्रशिक्षण पत्र्याच्या गोदामात मंडपाखाली घेण्यात आले पुरेशा पाण्याची व्यवस्था नाही, हवेची व्यवस्था नाही, जेवण व नाश्त्याची सुविधा नाही त्यामुळे ५० ते १०० किमी अंतरावरून आलेले कर्मचारी उन्हाने बेजार झाले. जीव गुदमरल्यासारखा झाला. पाणी नाही , भुकेने व्याकुळ झाल्याने काहींना चक्कर आली. त्यात अंबादास चौधरी हे पायी बसस्टॅण्डकडे परतीला निघाले अन चक्कर येऊन पडताच जागीच मयत झाले. त्याच वेळी अमळनेर येथील प्रशिक्षण हे उन्हाचा विचार करून वातानुकूलित शिवाजी नाट्यगृहात घेण्यात आले. प्रांताधिकारी सिमा आहिरे , तहसीलदार ज्योती देवरे दोन्ही अधिकारी महिला असतानाही कर्मचार्यांना पुरेशा पाण्याची व्यवस्था , भोजन, दोन वेळा मठ्ठा आदी व्यवस्था तसेच रुग्णवाहिकाची सोय करण्यात आली होती तर पाचोरा येथे खुल्या मैदानात मंडपात व्यवस्था करण्यात आली होती. अपूर्ण फॅन व मोजके कुलर यामुळे उष्णता होतीच. पाण्याची व्यवस्था होती पण भोजन नाही तसेच इतर काही ठिकाणी पाणी पुरेसे होते तर भोजन नव्हते त्यामुळे उन्हात लाम्ब अंतरावर जावे लागले , काही ठिकाणी चहाच पाजण्यात आला काही ठिकाणी दोन तास तर काही ठिकाणी चार तास प्रशिक्षण देण्यात आले एकाच निवडणुकीत एकाच जिल्ह्यात भिन्न व्यवस्थापनामुळे कर्मचाºयांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यात अधिकारी कायद्याचा बडगा दाखवत असल्याने काहींनी भीती घेतली होती.स्थानिक तालुक्यात नेमणुकीची मागणी२३ एप्रिल पर्यंत उन्हाची तीव्रता वाढणार असून तब्बल १२ तास एकाच खोलीत बसून मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने कर्मचाºयांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने मानवी शरीराची क्षमता ओळखून व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक भारती , माध्यमिक शिक्षक संघ , टी डी एफ संघटनांनी, मुख्याध्यापक संघटनांनी केली असून पुढील निवडणुकात कर्मचाºयांना महसूल कर्मचाºयांप्रमाणेच स्थानिक तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमण्याची मागणीही केली आहे.