शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार व्यवस्थापनामुळे शिक्षकाचा बळी गेल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:17 IST

निवडणूक प्रशिक्षणात सुविधांचा अभाव

अमळनेर : निवडणूक प्रशिक्षण काळातील शिक्षकाचा गेलेला बळी हा बेजबाबदार व्यवस्थापनामुळे गेल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. उन्हाच्या तीव्रतेचा व मानवी शरीराचा विचार न करता निव्वळ सरकारी काम पार पाडण्याच्या वृत्तीमुळे हा प्रकार घडल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहेभर उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक होत असून मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र निवडणूक पारदर्शी करण्यासाठी फक्त शिक्षक, ग्रामसेवक यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांचे तालुके बदलवून त्यांना दुसऱ्या तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमले गेले आहे. मात्र एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात प्रशिक्षण व्यवस्था भिन्न असल्याचे कर्मचाऱ्यांच्या अनुभवास आले असून बेजबाबदार व्यवस्थेमुळेच कळमसºयाचे शिक्षक अंबादास चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे.चाळीसगाव येथे शिक्षकांचे प्रशिक्षण पत्र्याच्या गोदामात मंडपाखाली घेण्यात आले पुरेशा पाण्याची व्यवस्था नाही, हवेची व्यवस्था नाही, जेवण व नाश्त्याची सुविधा नाही त्यामुळे ५० ते १०० किमी अंतरावरून आलेले कर्मचारी उन्हाने बेजार झाले. जीव गुदमरल्यासारखा झाला. पाणी नाही , भुकेने व्याकुळ झाल्याने काहींना चक्कर आली. त्यात अंबादास चौधरी हे पायी बसस्टॅण्डकडे परतीला निघाले अन चक्कर येऊन पडताच जागीच मयत झाले. त्याच वेळी अमळनेर येथील प्रशिक्षण हे उन्हाचा विचार करून वातानुकूलित शिवाजी नाट्यगृहात घेण्यात आले. प्रांताधिकारी सिमा आहिरे , तहसीलदार ज्योती देवरे दोन्ही अधिकारी महिला असतानाही कर्मचार्यांना पुरेशा पाण्याची व्यवस्था , भोजन, दोन वेळा मठ्ठा आदी व्यवस्था तसेच रुग्णवाहिकाची सोय करण्यात आली होती तर पाचोरा येथे खुल्या मैदानात मंडपात व्यवस्था करण्यात आली होती. अपूर्ण फॅन व मोजके कुलर यामुळे उष्णता होतीच. पाण्याची व्यवस्था होती पण भोजन नाही तसेच इतर काही ठिकाणी पाणी पुरेसे होते तर भोजन नव्हते त्यामुळे उन्हात लाम्ब अंतरावर जावे लागले , काही ठिकाणी चहाच पाजण्यात आला काही ठिकाणी दोन तास तर काही ठिकाणी चार तास प्रशिक्षण देण्यात आले एकाच निवडणुकीत एकाच जिल्ह्यात भिन्न व्यवस्थापनामुळे कर्मचाºयांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यात अधिकारी कायद्याचा बडगा दाखवत असल्याने काहींनी भीती घेतली होती.स्थानिक तालुक्यात नेमणुकीची मागणी२३ एप्रिल पर्यंत उन्हाची तीव्रता वाढणार असून तब्बल १२ तास एकाच खोलीत बसून मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने कर्मचाºयांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने मानवी शरीराची क्षमता ओळखून व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक भारती , माध्यमिक शिक्षक संघ , टी डी एफ संघटनांनी, मुख्याध्यापक संघटनांनी केली असून पुढील निवडणुकात कर्मचाºयांना महसूल कर्मचाºयांप्रमाणेच स्थानिक तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर नेमण्याची मागणीही केली आहे.