शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने मोडून पडला कणा, तरी सोडला नाही अभ्यासाचा बाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:56 IST

माणसावर संकट कितीही येवो. जिद्द आणि चिकाटी असली तर त्यावर मात करता येऊ शकते, हे दहावीचा निकाल लागल्यानंतर तालुक्यातील चोरवड येथील अवघ्या सोळा वर्ष वयाच्या आशुतोष गोलांडे या तारुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देआशुतोषची उल्लेखनिय जिद्ददहावीच्या सीबीएसई परीक्षेत मिळविले ९४.४ टक्के गुण

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : माणसावर संकट कितीही येवो. जिद्द आणि चिकाटी असली तर त्यावर मात करता येऊ शकते, हे दहावीचा निकाल लागल्यानंतर तालुक्यातील चोरवड येथील अवघ्या सोळा वर्ष वयाच्या आशुतोष गोलांडे या तारुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. खरे, तर ‘देव तारी, त्याला कोण मारी’ याचा एक अनुभवही या विद्यार्थ्याची जिद्द व चिकाटीतून समोर आला आहे. दहावीची परीक्षा अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपली असताना आशुतोषचा अपघात झाला. अपघातात एक पाय पूर्णपणे निकामी झाला, तर दुसºया पायावरही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र यावेळी आशुतोष आपण अपघातातून वाचलो किंवा आपल्याला अपंगतत्व आले याची काळजी करण्यापेक्षा मी दहावीची परीक्षा कशी देणार, असा प्रश्न त्याने उपस्थित केला व इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेत तब्बल ९४.४ टक्के गुण मिळवून त्याची जिद्द व चिकाटी हे त्याने दाखवून दिले.भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील रहिवासी रवींद्र रमेश गोलांडे हे दीपनगर येथे रोजंदारीवर मोलमजुरी करून परिवाराचा गाडा चालवत आहे. त्यांना दोन मुले आहे. मोठा मुलगा आशुतोष हा लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे त्याला शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी दाखल केले. यावर्षी आशुतोष हा दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला आजोबा रवींद्र गोलांडे हे सकाळी दररोज शिकवणीसाठी शहरात नेत होते. ६ जानेवारी रोजी आजोबा सोबत आशुतोष हा शहरात शिकवणीसाठी जात होता. सकाळी अंधाराची वेळ होती. चोरवडजवळील नाल्याजवळ रस्त्यात पडलेल्या एका बैलगाडीवर त्यांची मोटारसायकल आदळली. यावेळी आशुतोष मोटार सायकलवरून खाली पडला. मात्र त्याचवेळी मागून येणारे एक वाहन त्याच्या दोन्ही पायावरुन गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सकाळी अंधाराच्या वेळेस अगोदर बैलगाडी दिसून आले नाही. त्यात मागून येणारे वाहन हेही दिसले नाही. त्यामुळे आशुतोष आजोबांसोबत रस्त्यात काही वेळ पडला. मात्र त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. यात आशुतोषचे प्राण वाचले. मात्र एक पाय पूर्णपणे निकामी झाला, तर दुसºया पायाचीही शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आशुतोष काही दिवसांनी शुद्धीवर आला. त्यावेळी त्याने त्याच्यावर बीतलेल्या प्रसंगापेक्षा आता मी दहावीची परीक्षा कशी देणार? असा प्रश्न त्याने नातेवाईकासह डॉक्टरांना विचारला. परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मी तोपर्यंत सुधारणार का? अशी विचारणा तो डॉक्टर्ससह नातेवाईकांना विचारू लागला. खरं तर एवढ्या मोठ्या अपघातात जीव वाचला किंवा आता आपण अपंग झालो याची काळजी घेण्यापेक्षा तो दहावीची परीक्षा कशी देणार याचा जास्त विचार करू लागला. यातून त्याची जिद्द चिकाटी दिसून येत होती.आशितोष याचा अपघात ६ जानेवारी रोजी झाला. त्याच दिवशी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्याचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला, तर १६ जानेवारी रोजी दुसºया पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. २२ फेब्रुवारी रोजी त्याला दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. तेव्हापासून दहावीची परीक्षाही दोन महिने दूर होती. अपघातामुळे अशितोष अभ्यास करू शकला नाही. तर परीक्षेसाठीही त्याला पलंगावरून उचलून परीक्षा केंद्रावर न्यावे लागत होते. अशा परिस्थितीत आशुतोष याने दहावीची परीक्षा दिली. मात्र तरीही सोमवार, ६ मे रोजी लागलेल्या दहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेत ९४.४ टक्के गुण मिळवून तो विद्यालयात दुसरा आला. खरे, तर ...जिद्द व चिकाटी असली तर, कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. हा संदेश आशुतोषने विद्यार्थ्यांना दिल्याचे दिसून येत आहे. तर ‘देव तारी, त्याला कोण मारी’, असा प्रकारही त्याच्या अपघातातून त्याला मिळालेले जीवदान व जीवावर बेतलेले संकट पायावर गेल्याचे दिसून आले. लहान वयातच अपंगत्वावर मात करण्याची जिद्द आशुतोष् मध्ये असल्याचेही या अपघातातून दिसून आले.दरम्यान, आशुतोष गोलांडे याने अतिशय कठीण परिस्थितीत मिळवलेले यश पाहून त्याचा आज सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे व सरपंच प्रवीण गुंजाळ यांनी घरी जाऊन सत्कार केला.