शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

जामनेर येथे 'कोरोना'ला विसरून व्यवहारांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:20 IST

जामनेर येथे कोरोनाला विसरून अनेक ठिकाणी व्यवहारांना गती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुख्य रस्त्यावर गर्दी कायमकुठे नियमांचे पालन, तर कुठे उल्लंघन

(सैय्यद लियाकत/मोहन सारस्वत)जामनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या धास्तीमुळे अडीच महिने घरात थांबून असलेले नागरिक आता घराबाहेर पडले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९ पर्यंत पोहोचली असली तरी कोरोनाच्या या संकटाला विसरून तालुक्यात व्यवहार सुरू झाले आहेत. तालुक्यात २० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एक-एक रुग्ण संख्या वाढत गेली. शहरात व तालुक्यात कोरोना पोहोचल्याने नागरिकात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. त्यातच तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३९ पर्यंत पोहोचल्याने ही रुग्णसंख्या आणखी वाढते की काय, अशी धास्ती असतानाच अडीच महिन्यापासून आपले व्यवहार बंद ठेवून घरात थांबलेल्या नागरिक, व्यापाऱ्यांनी शहरातील व तालुक्यातील व्यवहार सुरू केले आहेत. यामुळे आता मेन रोड, बिओटी कॉम्प्लेक्स, वाकी रोड, जळगाव रोड, पाचोरा रोड, गांधी चौक, अरफ़ात चौक, श्रीराम मार्केट या भागात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची धास्ती मनात असली तरी अडीच महिन्यांपासून व्यवहार बंद असल्याने उलाढाल थांबली आहे. काम केल्याशिवाय पैसा हातात येणार नाही हे जाणून तालुक्यात व्यवहार पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे.तसेच खरेदी-विक्री, नफा तोटा , या विचारांमध्ये कोरोनाचा काहीसा विसर पडला आहे. त्यामुळे अडीच महिन्यांपासून धास्तावलेली मने पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास तयार झालेले असल्याचे दिसत आहे.नियमांचे पालन करणे आवश्यकबंद झालेले व्यवहार पुन्हा सुरू झाले असून फिजिकल डिस्टिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी उपाययोजना केली पाहिजे.अनेक कामगार घरीतालुक्यातील अनेक नागरिक कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, गुजरात, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले होते. मार्च आणि एप्रिल महिन्यात या शहरात कोरोनाचा फैलाव वाढला. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. कामे ठप्प झाली. त्यामुळे उपासमार होण्याच्या भीतीने ही मंडळी तालुक्यात दाखल झाली होती. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक असल्याची नोंदी आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे, मुंबई, गुजरात, या भागातील व्यवहारही सुरू झाले आहेत. अनेक कंपन्या पुन्हा सुरू झाल्या. या कंपन्यांना आता कामगारांचा तुटवडा जाणू लागल्याने तालुक्यातील काही कामगारांना कंपन्याकडून बोलावणे येत आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने मजूरवर्ग घरीच थांबले बरं? असे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर