शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बहुमत नसतानाही संचालक मंडळ अस्तित्वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:04 IST

पारोळा तालुक्यात अनेक विविध कार्यकारी संस्थांमध्ये बहुमत नसतांनाही संचालक मंडळ अस्तित्वात असून त्यांचा कारभारही सुरू असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.

ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील अपवाद वगळता सर्वच संस्थांची सारखीच स्थितीचौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

पारोळा : तालुक्यातील ६५ पैकी फक्त १० ते १५ विविध कार्यकारी संस्थांमध्ये संचालक मंडळाचे बहुमत आहे. तर बाकी संस्थांमध्ये बहुमत नसतांना देखील संचालक मंडळ अस्तित्वात आहे, आणि या संस्थांचा या जुन्या संचालकांच्या भरोशावर कारभार सुरू असल्याचा अजब नमुना समोर आला आहे. याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.२०१६ पासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजने अंतर्गत सन २००९ ते २०१६ या कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यन्त कर्जमाफी योजना अंमलात आणली. मात्र सन २००९ पूर्वीचे व २०१६ नंतरचे सर्वच शेतकºयांनी कर्जमाफीची मागणी करीत त्यांच्याकडील कर्ज भरणा थांबविल्याने जवळपास ९० टक्के लोक थकबाकीदार झालेले आहेत. त्यात संचालक मंडळातील काही संचालकांचा देखील समावेश आहे .पारोळा तालुक्यात ६५ विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. प्रत्येक संस्थेचे संचालक मंडळ १३ जणांचे आहे. त्यात बहुमतासाठी किमान ७ संचालक असणे गरजेचे आहे. मात्र थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे व काही संचालक थकबाकीदार झाल्यामुळे आजच्या परिस्थितीत काही संस्थामध्ये ५ ते ६ लोकांचे संचालक मंडळच अस्तित्वात आहे. संस्थेच्या पोटनियमानुसार थकबाकीदार संचालकांना नोटीसा देवून त्यांचेकडील कर्ज वसूल करून घेणे व कर्ज वसुल झाले तरच ते संचालक म्हणून पात्र राहू शकतात. कर्ज वसूल झाले नाही तर ते संचालक अपात्र ठरविण्याचा किंवा संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक बसविण्याचा अधिकार सहायक निबंधक यांना आहे. मात्र तालुक्यातील ६५ पैकी फक्त १० ते १५ संस्थांना संचालक मंडळात बहुमत आहे. तर बाकी संस्थांमध्ये बहुमत नसतांना देखील संचालक मंडळ अस्तित्वात आहे. प्राप्त माहीतीनुसार फक्त दोन संस्थामध्ये संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अनेक संस्थात बहुमत नसतांनाही संचालक मंडळ अस्तित्वात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे .अधिक माहिती जाणून घेतली असता काही सचिवांनी थकबाकीदार संचालकांची यादीच सहायक निबंधक यांचेकडे दिली नसल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच थकबाकीदार संचालकांना कमी करून त्या जागी स्विकृत संचालक घेण्याचा अधिकार सचिवांना नसतांना देखील काही सचिव लोकांना बेकायदेशीरपणे स्विकृत संचालक म्हणून घेत असल्याचा प्रकार सुरू आहे. याचीही चौकशी करण्यात यावी व दोषी सचिवांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. थकबाकीदार संचालक यांना अपात्र ठरविण्यात यावे व बहुमत नसलेल्या बºयाच संस्थाचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागी प्रशासक नेमणूक का झाली नाही, याचीही चौकशी करण्यात यावी. काही ठिकाणी थकबाकीदार संचालक मंडळाच्या सहाय्याने विकासोचा कारभार सुरू आहे. तर काही ठिकाणी बहुमत नसतांना ५ ते ६ संचालकांवर संस्थेचा कारभार सुरू आहे. ज्या संस्थेच्या सचिवांनी थकबाकीदार संचालकांची नावे सहायक निबंधक यांचेकडे पाठविली नाही .व बहुमत नसताना संस्थेचा कारभार सुरू ठेवला असेल तर अशा सचिवांची चौकशी होऊन दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.चुकीच्या धोरणाचा परिणामकर्जमाफीच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी सहकारी संस्था, सहकारी बँका यांच्या व्यवहारावर वाईट परिणाम दिसून येत असताना नियमांची पायमल्ली करून बहुमत नसूनही संचालक मंडळ अस्तित्वात असल्याचे प्रकार आढळून येत आहे. हा विषय फक्त पारोळा तालुक्यापुरता मर्यादित नसून जिल्ह्यासह महाराष्ट्रातदेखील सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.