शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘अबोध अवकाश’ म्हणजे विचार, भावना अन् प्रतिभेचा काव्यसंग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:20 IST

दिवाकर देव यांच्या प्रथम स्मृती दिनाबद्दल त्यांनी लिहिलेल्या कविता व रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन सोमवारी सायंकाळी महाबळ येथील हतनूर हॉल ...

दिवाकर देव यांच्या प्रथम स्मृती दिनाबद्दल त्यांनी लिहिलेल्या कविता व रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन सोमवारी सायंकाळी महाबळ येथील हतनूर हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, मु. जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक शरदच्चंद्र छापेकर, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर व जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव उपस्थित होते. यावेळी ‘अबोध अवकाश’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी दिवाकर देव यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरत अमळकर यांच्या हस्ते झाले.

दिवाकरांच्या कवितांमधून माणसाचे अचूक निरीक्षण -

यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात, दिवाकर देव यांच्या कवितांमधून माणसाचे अचूक निरीक्षण व निदान केले आहे. ते त्यांच्या कवितेच्या प्रत्येक ओळीतून आणि चित्रांमधूनही दिसत असल्याचे सांगितले. दिवाकरांचे व्यक्तिमत्त्व खूप विलक्षण होते, प्रत्येकाच्या भावना ते जपायचे, कौतुक करायचे, अतिशय हसतमुख त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगत, त्यांच्या सोबत घालविलेल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

तसेच यानंतर भरत अम‌ळकर यांनीही दिवाकर देव यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, देव यांनी विविध ठिकाणी केलेल्या आर्किटेकच्या कामांमुळे स्वत:चे एक समाजात वलय तयार केले होते. ते नेहमी आनंदी रहायचे, इतिहास व चित्रकला एकत्रितरीत्या सादर करणे हा त्यांचा आवडीचा विषय असल्याचेही अमळकर यांनी सांगितले. अनिल राव यांनी दिवाकर देव यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला असून, गेल्या वर्षी २६ डिसेंबरला आमच्या घरी आले होते. तीच आमची शेवटची भेट झाली असल्याचे राव यांनी सांगितले. त्यांच्या कवितांमधून त्यांची आठवण नेहमी सोबत राहणार असल्याचेही राव यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी दिवाकर देव यांच्या देश-विदेशातील मित्रांनी दिवाकर यांच्याबद्दल व्यक्त केेलेल्या भावना यावेळी डिजिटल स्क्रीनद्वारे दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहा पाटील यांनी केले तर आभार रेणुका जोशी यांनी मानले.