शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

आभाळमायेनं ‘मन्याड’च्या सेंच्युरीची ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : तालुक्यातील २२ गावांसाठी सिंचनाचे वरदान ठरलेल्या ‘मन्याड’ धरणाने सलग तिसऱ्या वर्षी सेंच्युरी ठोकल्याने हॅटट्रिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील २२ गावांसाठी सिंचनाचे वरदान ठरलेल्या ‘मन्याड’ धरणाने सलग तिसऱ्या वर्षी सेंच्युरी ठोकल्याने हॅटट्रिक साधली आहे. २०१६ मध्ये शतकी सलामी दिल्यानंतर मधली दोन वर्षे वगळता गत तीन वर्षापासून मन्याड ओव्हरफ्लो होत आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने २४ दिवस उशिराने १०० टक्के भरल्यानंतर गुरुवारी पहाटे साडेचार वाजता त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहिल्याने मन्याड नदी खळाळली.

गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजीच मन्याडच्या नावापुढे शतक झळकले होते. मन्याड ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चौकट

एकूण साठवण क्षमता १९०५ दलघफू

चाळीसगाव तालुक्याच्या पश्चिम शेती पट्ट्याला हिरवळीचा साज देणाऱ्या मन्याडने २२ गावातील सिंचनाखालील शेतीला संजीवनी दिली आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १९०५ दलघफू असून, मृतसाठा ४८३ दलघफू आहे. उपयोगी साठा १४२० दलघफू आहे.

१...मन्याडच्या सिंचन क्षेत्रात ऊस पिकाला मोठा फायदा होतो. याबरोबरच बागायती कपाशीसह फळबागांनाही या धरणामुळे सुपीकतेचा साज चढला आहे.

२...धरणाचे बुडीत क्षेत्र २ हजार १७७ म्हणजेच ८७१ हेक्टर आहे. त्यापैकी ४८० हेक्टर क्षेत्र लिफ्टवर भिजते.

३...खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

चौकट

४७ वर्षात ३२ वेळा ओव्हरफ्लो

१९७४ पासून गत ४७ वर्षात ३२ वेळा मन्याड धरण १०० टक्के भरले आहे.

-१९८७ ते २००१ असे सलग १४ वर्षही ते ओव्हरफ्लो झाले आहे. पुढे २००७ ते २०११ असे सलग पाच वर्षही ते शंभर टक्के भरुन वाहिले.

-२०१२मध्ये यात खंड पडला. २०१३ मध्ये पुन्हा ते ओव्हरफ्लो झाले.

-२०१४ व २०१५ मध्ये दुष्काळी सावट असल्याने मन्याडवरही याचा परिणाम झाला. २०१६ मध्ये पुन्हा मन्याडने सेंच्युरी गाठली.

चौकट

यंदा साधली ‘हॅटट्रिक’

गुरुवारी पहाटे ४.३० वाजता मन्याडने शतकी टप्पा ओलांडत सांडव्यावरून नदीच्या दिशेने झेप घेतली. त्याच्या ओव्हरफ्लोचे हे सलग तिसरे वर्ष आहे. २०१९मध्ये मन्याडला ओव्हरफ्लो व्हायला ऑक्टोबर उजाडला होता. २४ ऑक्टोबर रोजी ते भरले होते. गेल्या वर्षी आभाळकृपा वेळापत्रकानुसार होत होती. यामुळे २ ऑगस्ट रोजीच मन्याडने शंभरीचा झेंडा फडकवला होता.

यंदा पावसाने सारखी ओढ घेतली असून, अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे; मात्र गत वर्षाच्या तुलनेत २४ दिवस उशिरा का असेना मन्याडने यावर्षीही शंभरी पार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी खरीप हंगामात पावसाने ओढ घेतल्याने निम्म्याने घट येणार आहे; मात्र मन्याड भरल्याने याचा फायदा रब्बी हंगामासाठी होईल. मन्याड परिसरात रब्बी हंगामातील ऊस, फळबाग पिकांना मोठा फायदा होईल. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे.

महत्वाची चौकट

मन्याडसाठी नदीजोड फायदेशीर, पण मुहूर्त कधी ?

मन्याड धरणाची उंची वाढवावी. यासाठी अधूनमधून आंदोलनांचे मंडप टाकले जातात. तथापि, गेल्या अनेक वर्षापासून या प्रश्नाचा गुंता तसाच आहे. मन्याड धरणात गिरणा धरणातून वाहून जाणारे पाणी नदीजोडद्वारे आणावे, अशीही एक मागणी आहे. ही मागणीदेखील जुनीच आहे. मन्याड धरणाची उंची वाढवायची असल्यास अगोदर नदीजोड प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. गिरणा-मन्याड नदीजोड प्रकल्प झाल्यास गिरणा खोऱ्याला मोठा फायदा होणार आहे; मात्र याला मुहूर्त कधी लागणार? हा प्रश्न कायम आहे.