शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

तिसऱ्या दिवशीही कर्फ्यूला ९० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवारदरम्यान जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवारदरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. शुक्रवार व शनिवारी जळगावकरांनी या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला, तर कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारीदेखील शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, काही भागांमध्ये अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली तर अनेक रिक्षाचालकदेखील रविवारी शहरात फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या कर्फ्यूदरम्यान तिन्ही दिवस शहरातील संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवार व शनिवारच्या तुलनेत रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकानेदेखील काही प्रमाणात बंद होती. मात्र पहिल्या दोन दिवसाच्या तुलनेत रविवारी मुख्य बाजारपेठ व शहरातील इतर रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ काही प्रमाणात वाढलेली दिसून आली. विशेषकरून सायंकाळी ५ वाजेनंतर शहरातील उपनगरांमध्ये गर्दी आढळून आली.

सुभाष चौक, भिलपुरा परिसरात भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी

शहरातील मुख्य बाजार पेठ भागातील सुभाष चौक, शिवाजी रोड, भिल पुरा या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याचे चित्र पाहायला मिळाली. भाजीपाला विक्रेत्यांची दुकान थाटल्यामुळे याठिकाणी भाजीपाला घ्यायला काही नागरिकांची गर्दी झाली होती. पोलीस व मनपा प्रशासनाकडूनदेखील रविवारी काही प्रमाणात कर्फ्यूमध्ये ढील दिल्याचे चित्र दिसून आले. यासह रामानंदनगर भागात व गणेश कॉलनी चौक परिसरातदेखील फळविक्रेते व इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली दिसून आली.

मनपाकडून कारवाई

अनेक भागात भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याची माहिती मिळताच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून सुभाष चौक भागात काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच बळीराम पेठ भागातूनदेखील काही विक्रेत्यांचे साहित्यदेखील जमा करण्यात आले. तसेच भाजीपाल्याची ने-आण करणाऱ्या मालवाहतूक रिक्षाचालकांवरदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागतर्फे कारवाई करण्यात आली.

रिक्षाचालक आले रस्त्यावर

जिल्हा प्रशासनाकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान महत्त्वाच्या मालवाहतुकीच्या वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनांना शहरात वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी अनेक रिक्षाचालकांनी जिल्हा प्रशासनाचा आदेशाला हरताळ फासून अनेक रिक्षा रविवारी रस्त्यावर फिरताना दिसून आल्या. तसेच अनेक रिक्षाचालकांनी मास्कदेखील लावलेले नव्हते.

सर्व मार्केटमधील व्यापाऱ्यांनी १०० टक्के दिला प्रतिसाद

जिल्हा प्रशासनाकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शहरातील सर्व मुख्य मार्केटमधील व्यापार्‍यांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. महात्मा फुले मार्केट असो वा गोलाणी मार्केट, सराफ बाजार असो वा दाणाबाजार सर्व बाजारांमधील दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देऊन कर्फ्यूच्या तिन्ही दिवशी आपले दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प राहिली. मात्र व्यापारी बांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.