शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

तिसऱ्या दिवशीही कर्फ्यूला ९० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवारदरम्यान जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व मनपा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवारदरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. शुक्रवार व शनिवारी जळगावकरांनी या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला, तर कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारीदेखील शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, काही भागांमध्ये अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली तर अनेक रिक्षाचालकदेखील रविवारी शहरात फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या कर्फ्यूदरम्यान तिन्ही दिवस शहरातील संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवार व शनिवारच्या तुलनेत रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकानेदेखील काही प्रमाणात बंद होती. मात्र पहिल्या दोन दिवसाच्या तुलनेत रविवारी मुख्य बाजारपेठ व शहरातील इतर रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ काही प्रमाणात वाढलेली दिसून आली. विशेषकरून सायंकाळी ५ वाजेनंतर शहरातील उपनगरांमध्ये गर्दी आढळून आली.

सुभाष चौक, भिलपुरा परिसरात भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी

शहरातील मुख्य बाजार पेठ भागातील सुभाष चौक, शिवाजी रोड, भिल पुरा या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याचे चित्र पाहायला मिळाली. भाजीपाला विक्रेत्यांची दुकान थाटल्यामुळे याठिकाणी भाजीपाला घ्यायला काही नागरिकांची गर्दी झाली होती. पोलीस व मनपा प्रशासनाकडूनदेखील रविवारी काही प्रमाणात कर्फ्यूमध्ये ढील दिल्याचे चित्र दिसून आले. यासह रामानंदनगर भागात व गणेश कॉलनी चौक परिसरातदेखील फळविक्रेते व इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली दिसून आली.

मनपाकडून कारवाई

अनेक भागात भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याची माहिती मिळताच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून सुभाष चौक भागात काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच बळीराम पेठ भागातूनदेखील काही विक्रेत्यांचे साहित्यदेखील जमा करण्यात आले. तसेच भाजीपाल्याची ने-आण करणाऱ्या मालवाहतूक रिक्षाचालकांवरदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागतर्फे कारवाई करण्यात आली.

रिक्षाचालक आले रस्त्यावर

जिल्हा प्रशासनाकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान महत्त्वाच्या मालवाहतुकीच्या वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनांना शहरात वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी अनेक रिक्षाचालकांनी जिल्हा प्रशासनाचा आदेशाला हरताळ फासून अनेक रिक्षा रविवारी रस्त्यावर फिरताना दिसून आल्या. तसेच अनेक रिक्षाचालकांनी मास्कदेखील लावलेले नव्हते.

सर्व मार्केटमधील व्यापाऱ्यांनी १०० टक्के दिला प्रतिसाद

जिल्हा प्रशासनाकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शहरातील सर्व मुख्य मार्केटमधील व्यापार्‍यांनी १०० टक्के प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. महात्मा फुले मार्केट असो वा गोलाणी मार्केट, सराफ बाजार असो वा दाणाबाजार सर्व बाजारांमधील दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देऊन कर्फ्यूच्या तिन्ही दिवशी आपले दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प राहिली. मात्र व्यापारी बांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.