शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

२४ तासाच्या आत जीएमसीत ९० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रुग्ण उशिरा दाखल होत असल्याने अगदी कमी कालवधीत या रुग्णांचा मृत्यू होत असून उपचारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रुग्ण उशिरा दाखल होत असल्याने अगदी कमी कालवधीत या रुग्णांचा मृत्यू होत असून उपचारांना होणारा उशीर जीवावर बेतत असल्याची गंभीर स्थिती या दुसऱ्या लाटेत समोर आली आहे. अनेकांना तर आपत्कालीन कक्षात दाखल केल्यानंतर काही कालावधीतच त्यांचा मृत्यू झाला आहे. एकत्रित चित्र बघता २४ तासाच्या आत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९० मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात आता पुरेसे बेड उपलब्ध आहेत. मात्र, मार्च महिना आणि एप्रिलच्या दोन आठवड्यापर्यंत अगदी बिकट परिस्थिती होती. बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेतच फिरावे लागत होते. यातच उशीर होऊन त्यांचा मृत्यू होत होता. अनेकांना व्हेंटीलेटर मिळत नव्हते. खासगी व शासकीय यंत्रणेत बेडसाठी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही बेड उपलब्ध होत आहेत.

व्हेंटिलेटरची संख्या वाढली

जीएमसीत नुकतेच पीएम केअर फंडकडून ५० व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता हव्या त्या ठिकाणी व्हेंटिलेटर लावण्यात येत आहेत. ज्या कक्षात रुग्ण दाखल आहेत त्या कक्षात गरज पडल्यास व्हेंटिलेटर हलविले जात आहे.

एप्रिल महिन्यात झालेले एकूण मृत्यू : ५५९

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले मृत्यू : २०१

एकूण ब्रॉड डेड १९

सहा तासाच्या आत मृत्यू ४३

६ ते २४ तासाच्या आत मृत्यू ९०

कोण कारणीभूत

ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर आहेत, मात्र, ते पुरसे नाहीत, त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यास त्यांना थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवावे लागते. अशा स्थितीत चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर सारख्या तालुक्यांमधून रुग्ण यायला उशीर होतो.

रुग्णच अंगावर काढत असल्याने अगदी ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतरच रुग्णालयात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मार्च महिन्यात काही मृत्यू हे वेळेवर उपचार न मिळाल्याने झाले आहेत. यात बेड फूल असणे, व्हेंटिलेटर कुठेच न मिळणे यामुळे ही स्थिती उद्भवली होती.

एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाही ही स्थिती कायम होती. त्यामुळेही रुग्णालयात दाखल करताच काही तासांनी रुग्णाचा मृत्यू होत होता. हे प्रमाण आता कमी झाले आहे.

आपत्कालीन कक्षात लावले जाते व्हेंटिलेटर

गंभीरावस्थेत दाखल रुग्णाला आपत्कालीन कक्षात असलेल्या बेडवरच व्हेंटिलेटर लावण्यात येते. केवळ आयसीयूमध्ये नाही तर ज्या कक्षात आवश्यकता असेल त्या कक्षात आता व्हेंटिलेटर लावले जाते. मुळात बाहेरूनच रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याने त्यांचा काही तासांच्या आत मृत्यू होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.