शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

२४ तासाच्या आत जीएमसीत ९० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रुग्ण उशिरा दाखल होत असल्याने अगदी कमी कालवधीत या रुग्णांचा मृत्यू होत असून उपचारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रुग्ण उशिरा दाखल होत असल्याने अगदी कमी कालवधीत या रुग्णांचा मृत्यू होत असून उपचारांना होणारा उशीर जीवावर बेतत असल्याची गंभीर स्थिती या दुसऱ्या लाटेत समोर आली आहे. अनेकांना तर आपत्कालीन कक्षात दाखल केल्यानंतर काही कालावधीतच त्यांचा मृत्यू झाला आहे. एकत्रित चित्र बघता २४ तासाच्या आत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९० मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात आता पुरेसे बेड उपलब्ध आहेत. मात्र, मार्च महिना आणि एप्रिलच्या दोन आठवड्यापर्यंत अगदी बिकट परिस्थिती होती. बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेतच फिरावे लागत होते. यातच उशीर होऊन त्यांचा मृत्यू होत होता. अनेकांना व्हेंटीलेटर मिळत नव्हते. खासगी व शासकीय यंत्रणेत बेडसाठी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही बेड उपलब्ध होत आहेत.

व्हेंटिलेटरची संख्या वाढली

जीएमसीत नुकतेच पीएम केअर फंडकडून ५० व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता हव्या त्या ठिकाणी व्हेंटिलेटर लावण्यात येत आहेत. ज्या कक्षात रुग्ण दाखल आहेत त्या कक्षात गरज पडल्यास व्हेंटिलेटर हलविले जात आहे.

एप्रिल महिन्यात झालेले एकूण मृत्यू : ५५९

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले मृत्यू : २०१

एकूण ब्रॉड डेड १९

सहा तासाच्या आत मृत्यू ४३

६ ते २४ तासाच्या आत मृत्यू ९०

कोण कारणीभूत

ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर आहेत, मात्र, ते पुरसे नाहीत, त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यास त्यांना थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवावे लागते. अशा स्थितीत चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर सारख्या तालुक्यांमधून रुग्ण यायला उशीर होतो.

रुग्णच अंगावर काढत असल्याने अगदी ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतरच रुग्णालयात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मार्च महिन्यात काही मृत्यू हे वेळेवर उपचार न मिळाल्याने झाले आहेत. यात बेड फूल असणे, व्हेंटिलेटर कुठेच न मिळणे यामुळे ही स्थिती उद्भवली होती.

एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाही ही स्थिती कायम होती. त्यामुळेही रुग्णालयात दाखल करताच काही तासांनी रुग्णाचा मृत्यू होत होता. हे प्रमाण आता कमी झाले आहे.

आपत्कालीन कक्षात लावले जाते व्हेंटिलेटर

गंभीरावस्थेत दाखल रुग्णाला आपत्कालीन कक्षात असलेल्या बेडवरच व्हेंटिलेटर लावण्यात येते. केवळ आयसीयूमध्ये नाही तर ज्या कक्षात आवश्यकता असेल त्या कक्षात आता व्हेंटिलेटर लावले जाते. मुळात बाहेरूनच रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याने त्यांचा काही तासांच्या आत मृत्यू होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.